Monday, November 9, 2009

<span title="Click to correct" class="transl_class" id="0"><span title="Click to correct" class="transl_class" id="0">जळगावमध्ये</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="1"><span title="Click to correct" class="transl_class" id="1">राज्यस्तरीय</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="2"><span title="Click to correct" class="transl_class" id="2">मराठा</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="3"><span title="Click to correct" class="transl_class" id="3">साहित्य</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="4"><span title="Click to correct" class="transl_class" id="4">संमेलन</span></span>
जळगावमध्ये राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन Print
वार्ताहर / जळगाव
मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराया साहित्य परिषदेतर्फे येथे ३१ ऑक्टोबर तर दोन नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे प्रा. जैमिनी कडू यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून खा. ए. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी सुरू असल्याची माहिती सचिव प्रा. दिलीप चौधरी यांनी दिली आहे.
मराठा बहुजन समाजाचे सांस्कृतिकरण व्हावे, त्यातून अखिल विश्वासातील मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न व्हावे या विश्वकल्याणाच्या भावनेतून तुकोबाराया साहित्य परिषदेतर्फे जळगाव जिल्हा बँकेच्या सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुख डॉ. ऑम्वेट यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलन स्थळाला ‘क्रांतिवीरांगना कॅप्टन लिला पाटील साहित्य नगरी’ नाव देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
३१ ऑक्टोबर रोजी साहित्यदिंडी तसेच नवोदितांचे कवी संमेलन चंद्रपूरचे प्रा. दिलीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. एक नोव्हेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ तसेच महापरिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाजातील १९ प्रमुख प्रतिनिधी आपली भूमिका मांडणार आहेत. सत्यशोधक साहित्याचे डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. दोन नोव्हेंबर रोजी ‘शिकलेल्यांना अधिक समाजाभिमुख करण्यासाठी आवश्यक साहित्याचा आराखडा’ विषयावर डॉ. शरणकुमार लिंबाळे, रजनी ठाकूर, प्रदिप साळुंखे आणि सहित्यिक शरद पाटील यांची प्रकट मुलाखत तसेच स्त्री साहित्यातील कृषी संवेदना या विषयावर परिसंवाद होईल. संत साहित्यातील धार्मिक व सामाजिक चित्रे या परिसंवादाने संमेलनाचा समारोप होईल. बहुजन साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे







<span title="Click to correct" class="transl_class" id="0">मराठा</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="1">साहित्य</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="2">हेच</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="3">मुळात</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="4">मराठी</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="5">साहित्य</span>- <span title="Click to correct" class="transl_class" id="6">जैमिनी</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="7">कडू</span>
मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य- जैमिनी कडू
जळगाव, २ नोव्हेंबर / वार्ताहर
मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य आहे, तसेच मराठी ही भाषा मुळात मराठा असून भाषा हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने मराठा भाषा असे संबोधले जात नाही, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी येथे केले. येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. गेल ऑमवेट यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू यांनी मराठा साहित्य, मराठी भाषा अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. शैला जैमिनी, खा. ए. टी. पाटील, आ. संजय सावकारे, मराठा सेवा संघाचे अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर, नेताजी गोरे, सुधीर सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता ढिकले, प्रविण गायकवाड, रामनाथ सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्याप्रमाणे गुजराथी, पंजाबी, बंगाली, बिहारी, कानडी, आसामी, चीनी, जर्मनी भाषांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो, त्याप्रमाणे मराठा भाषा ऐवजी मराठी भाषा असा उल्लेख करण्यात येतो.
मराठा व मराठी हे शब्द जातवाचक नसून ते भाषा वाचक, प्रांत वाचक असल्याचे प्रा. कडू यांनी सांगितले.
ज्या भौगोलिक प्रदेशात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेवरूनच भारतात प्रांतरचना झाली. परंतु प्रांतरचना भाषेवरून करताना राजकारण्यांनी मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील अनेक मराठी भाषिक गावे महाराष्ट्राला जोडण्याचा मोठा गुन्हा केला असून त्याची फळे आज आपण भोगत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा साहित्यिकांना डावलण्याचे कारस्थान वर्षांनुवर्षे सुरूच असून सोप्या भाषेत मराठी जनांना जगण्याची व्याख्या सांगणाऱ्या तुकोबांनाही या दिव्यातून जावे लागले, तसेच एकूणच मराठी साहित्यावर ब्राह्मणीकरणाचा प्रभाव दिसून येत आहे, असे मत डॉ. गेल यांनी मांडले. ‘परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा समन्वय आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक साहित्य परिषदेचे प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर हे होते. डॉ. गेल यांनी प्रस्थापितांविरुद्ध तोफ डागली. मराठी संत साहित्यात असलेले ब्राम्हणीकरणावर त्यांनी हल्ला चढविला. तुकोबांना गुरूची गरज नव्हती असे सांगत त्यांनी ‘ईडा पिडा जावो व बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना त्यांनी केली.

मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य- जैमिनी कडू Print
जळगाव, २ नोव्हेंबर / वार्ताहर
मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य आहे, तसेच मराठी ही भाषा मुळात मराठा असून भाषा हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने मराठा भाषा असे संबोधले जात नाही, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी येथे केले. येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. गेल ऑमवेट यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू यांनी मराठा साहित्य, मराठी भाषा अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. शैला जैमिनी, खा. ए. टी. पाटील, आ. संजय सावकारे, मराठा सेवा संघाचे अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर, नेताजी गोरे, सुधीर सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता ढिकले, प्रविण गायकवाड, रामनाथ सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्याप्रमाणे गुजराथी, पंजाबी, बंगाली, बिहारी, कानडी, आसामी, चीनी, जर्मनी भाषांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो, त्याप्रमाणे मराठा भाषा ऐवजी मराठी भाषा असा उल्लेख करण्यात येतो.
मराठा व मराठी हे शब्द जातवाचक नसून ते भाषा वाचक, प्रांत वाचक असल्याचे प्रा. कडू यांनी सांगितले.
ज्या भौगोलिक प्रदेशात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेवरूनच भारतात प्रांतरचना झाली. परंतु प्रांतरचना भाषेवरून करताना राजकारण्यांनी मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील अनेक मराठी भाषिक गावे महाराष्ट्राला जोडण्याचा मोठा गुन्हा केला असून त्याची फळे आज आपण भोगत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा साहित्यिकांना डावलण्याचे कारस्थान वर्षांनुवर्षे सुरूच असून सोप्या भाषेत मराठी जनांना जगण्याची व्याख्या सांगणाऱ्या तुकोबांनाही या दिव्यातून जावे लागले, तसेच एकूणच मराठी साहित्यावर ब्राह्मणीकरणाचा प्रभाव दिसून येत आहे, असे मत डॉ. गेल यांनी मांडले. ‘परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा समन्वय आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक साहित्य परिषदेचे प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर हे होते. डॉ. गेल यांनी प्रस्थापितांविरुद्ध तोफ डागली. मराठी संत साहित्यात असलेले ब्राम्हणीकरणावर त्यांनी हल्ला चढविला. तुकोबांना गुरूची गरज नव्हती असे सांगत त्यांनी ‘ईडा पिडा जावो व बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना त्यांनी केली.
शोषणविरोधी मूलतत्त्वाने संघटित होण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 01, 2009 AT 11:00 PM (IST)

जळगावात मराठा साहित्य संमेलनाचे थाटात उद्‌घाटन

जळगाव - महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याची शिक्षण व्यवस्था, शिक्षणाचे धोरण बहुजनांच्या हाती दिले असते, तर राज्यात ज्या जाती- जातींच्या भिंती आहेत, त्या राहिल्या नसत्या. त्या दूर करण्यासाठी प्रत्येकाने वाचनसंस्कृती वाढविली पाहिजे. संमेलनातून समतावादी व समन्वयवादी धोरणाची अपेक्षा आहे. आपण सर्व शोषणविरोधी समतावादी मूलतत्त्वाने संघटित झाले, तर एक उज्ज्वल भवितव्य निर्माण करण्याचे श्रेय आम्हाला निश्‍चितच घेता येणार आहे, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी आज येथे केले.

येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे रविवारी सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन क्रांती वीरांगना कॅप्टन लीला पाटील साहित्यनगरीत डॉ. गेल ऑमवेट (नवी दिल्ली) यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू बोलत होते. कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रतीकात्मक नांगरावर पुष्प उधळून जिजाऊंच्या जय जयकारात उद्‌घाटन झाले. या वेळी लॅपटॉप, लेखणी ठेवण्यात आली.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर व ऍड. पुरुषोत्तम खेडेकर, खासदार ए. टी. पाटील, महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे, आमदार संजय सावकारे, परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे, सौ. शैल जैमिनी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा ढवळे, मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष इंजिनिअर नेताजी गोरे, ब्रिगेडिअर सुधीर सावंत, "शिवधर्मा'चे देवानंद कापसे, शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील- भोयर, संघाचे प्रदेश सचिव विजयकुमार ढुगे, परिषदेचे महाराष्ट्र सचिव प्रा. दिलीप चौधरी, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पाटील व्यासपीठावर होते.

प्रा. कडू म्हणाले, की महाराष्ट्र स्थापनेनंतर शिक्षणाची धोरणे तयार करण्याची जबाबदारी बहुजनांना कमी लेखणाऱ्यांच्या हातात गेली. त्यांनी बहुजनांना कमी लेखून बहुजनांचा विकास न होता, ते आपल्याच आधिपत्याखाली कसे राहतील याचा विचार केला. त्याचे वास्तव चित्र समाजासमोर येऊ दिले नाही. यामुळे आज सांस्कृतिक विचारांची दरी निर्माण झाली. त्यास आपण सर्व दोषी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो, तेव्हा आजची पिढी शिवाजी महाराजांचे नाव ठीक आहे. मात्र, इतरांचे काय, असा प्रश्‍न करतात. या विचारांच्या दरीला शैक्षणिक धोरण जबाबदार आहे. बाराखडीतला "भ' भटजीचाच का शिकविला गेला, भोवऱ्याचा का नाही?, "ग' गणपतीचा का शिकविला गेला, गवताचा का नाही?

ते म्हणाले, की सर्व महापुरुषांचे विचार आपण समजून घेतले, तरच जीवन कळणार आहे. पाच हजार वर्षांपासून जो माणूस आहे, त्याला सामाजिक प्रतिष्ठा त्याला नाही. ती प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आमची धडपड आहे. शोषणाचा विरोध व समतेची स्थापना, हे आमचे ध्येय आहे. भगवान गौतम बुद्धांनी मनाचा विचार करून धम्म सांगितला.

मराठा साहित्य समजून घ्यावे

मराठी भाषा ही मुळात मराठा भाषा आहे. भाषा हा शब्द स्त्रीलिंगी असल्याने "मराठा भाषा' असे संबोधिले जात नाही. मराठा- मराठी हे शब्द जात-वाचक नसून, ते भाषावाचक, प्रांतवाचक आहेत. आम्हाला आमचे अस्तित्व निर्माण करायचे आहे. आमचा माणूस आम्हाला मोठा करायचा आहे. जोपर्यंत ही भावना आपल्यात भिनत नाही, तोपर्यंत ब्राह्मणवाद्यांचा विजय होणारच आहे. आजची युवापिढी व आपल्यात असलेली सांस्कृतिक दरी कमी करून समाजाला वाचवायचे असेल, तर मराठा साहित्य हे समजून घेतले पाहिजे. आमच्यात न्यूनगंडाची भावना आहे, ती काढून टाकली पाहिजे. समतावादी- समन्वयवादी धोरणाची अपेक्षा आहे. आम्ही जी भूमिका घेऊन कार्यरत झालो आहोत, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मराठा साहित्यिकांनी, लेखकांनी याबदलाकडे अधिक परिणामकारक रीतीने पाहिले पाहिजे.

या वेळी उद्‌घाटक डॉ. ऑमवेट, परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. खंदारे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरे, आयुक्त सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. लीलाधर पाटील, रामचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साहित्यिक जयसिंग वाघ यांनी परिचय करून दिला.

मराठा आरक्षणासाठी बहुजनांनी सक्रिय सहभागी होण्याची गरज
मराठा सेवा संघप्रणित पाचवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे शनिवारी



नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांच्या अध्यक्षीय भाषणाचे संपादित अंश.
पाचवे अ.भा. मराठा साहित्य संमेलन, नागपूर येथे आयोजित करून आपण फार मोठे औचित्य साधले आहे. आपण संमेलनाच्या आवतणात म्हटल्याप्रमाणे, ‘मराठीतील पहिल्या नागवंशीय मानवाच्या साहित्याची आठवण ठेवणे खरोखरच अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राला मराठी भाषा आणि मराठी वाड्:मय याची जाण आणि भान विदर्भातल्या नागभूमीने करून देऊन विश्वापुढे एक अलौकिक जीवनयात्रा म्हणून साहित्याचा प्रक्षेप उभा केला आहे. हेच वैश्विक मराठा साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे सूत्र आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर, अखिल विश्वात जेथे जेथे म्हणून मराठा माणूस पोहोचत आहे, त्यांच्या संबंधाचा आलेख हा परंपरा आणि वर्तमान यांना साधणाऱ्या वाड्:मयाचा प्रवास करतो. याच भूमिकेतून या संमेलनाचे आयोजन केले आहे.
संत शिरोमणी तुकोबारायांचा विषय निघाला की, गाथेचे तरंगणे आणि वैकुंठगमन हे मुद्दे आलेच. गाथेचा इतिहास आपणास ठाऊकच आहे. तुकोबारायांचा सखा आणि टाळकरी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या अथक प्रयत्नामुळे गाथा पुन:निर्मित झाली.
बरे झालो देवा कुणबी झालो
अन्यथा असतो दंभे मेलो
कुणबी म्हणजे शेतात सहकुटुंब राबराब राबून तिथेच घर-झोपडं बांधून जीवन कंठणारा अन्नदाता, अर्थात, शेतकरी इतका व्यापक अर्थाने कुणब्याचा अर्थ विस्तारतो. ‘कुणब्यासारखा दाता नाही’ म्हणतात पण, आज हाच अन्नदाता अन्नान्न स्थितीत आलेला आहे. असो आता इथे आपला मुद्दा संत तुकोबांच्या वैकुंठगमनाचा आहे. आजही महाराष्ट्राच्या विद्यापीठांमध्ये शालेय अभ्यासक्रमांमध्ये महाराजांचे वैकुंठगमन झाल्याचेच शिकविले जात आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. वारकरीवर्ग भक्तिभावनेतून वैकुंठगमनाच्या बाजूने असला म्हणून हे सत्य इंद्रायणीच्या डोहातच तळमळत ठेवणे कितपत योग्य?
आज मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यासाठी मराठा आरक्षणाच्या दृष्टीने याचा नीट अभ्यासपूर्ण लेखाजोखा आपणास मांडावयाचा आहे. मराठा हा स्वराज्यासाठी लढत राहिलेला समाज आहे. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा आदर करतो. त्यांना अन् त्यांच्या वारसदारांना अनेक सवलतींचा लाभ देतो, मग हाच निकष स्वराज्यासाठी लढणाऱ्या मराठय़ांसाठी का नाही? मराठा संज्ञेत त्यावेळी मोडणाऱ्या अठरापगड जातींपैकी अनेक जाती-जमातींना सवलतींचा लाभ झालेला आहे. आज खुद्द विदर्भ-नागपूरकडील मराठय़ांची दुरावस्था कशी आहे, हे आरक्षण विरोधकांना ठाऊक आहे का? इथे राजे शिर्के सायकलच्या पंक्चरचं दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. पुण्या-मुंबईकडे शेकडोंनी मराठा बांधव माथाडी हमालाचे आणि रिक्षाचालकाचे काम करतात. दीड टक्के मराठा लोक राज्यकर्ते झाले म्हणून उर्वरित लोकही पुढारले, असे म्हणणे हा कुठला युक्तिवाद? अकारण मराठय़ांच्या छातीत अंगार अन् मेंदूत वर्णवर्चस्वाचा पोकळ अहंकार आजवर भरवण्यात आला. आता कुठे मराठा सेवा संघाच्या प्रयत्नाने हे कोडं मोकळं होऊ लागलं आहे पण, मराठा आरक्षण परिषदेतही भाऊबंदकी सुरू होताना दिसते, हे क्लेशदायक आहे.
शेतकरी-कष्टकरी मराठा, आज आरक्षणप्राप्त जाती-जमातींच्या तुलनेत माघारलेला आहे. राजकारणी मराठय़ांना मागासवर्गात मोडणं आवडत नाही. ज्यांना समाजाचं मागासलेपण मान्य नाही, त्यांनी वाटल्यास आरक्षणाचा लाभ न घ्यावा पण, म्हणून इतरांच्या तोंडाचा घास हिसकू नये. कुणबी समाज ओबीसी असून मराठय़ांच्या आरक्षणासाठी पुढे आला. त्यामध्ये इतर बंधू बहुजनांनीही सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे.
शेतकरी हा बहुजन वर्गातलाच, आज शिवाजी राजे असते तर कदाचित एकाही किसानाची आत्महत्या झाली नसती. शेतकऱ्यांविषयी छत्रपती शिवरायांना अपार आस्था होती. त्यांनी स्वराज्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी केली होती. अशी ती तेव्हाची शिवशाही आणि अशी ही आजची लोकशाही! पण, आम्हा कास्तकारांना आज पुढारीही जोशीच निवडावा लागला. यापेक्षा विरोधाभास तो कोणता? ‘शिवधर्म’ नावाची जी धर्मक्रांती मराठा सेवा संघाने घडवून आणली, त्या क्रांतीची तुलना धम्मक्रांतीशी होऊ शकेल एवढय़ा मोलाचे ते कार्य आहे. शिवधर्माच्या प्रचारासाठी आता त्यागी आणि अभ्यासू प्रवक्ते आणि संघटकांची गरज आहे.
यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नांमुळे साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती झाली. यावर बहुजनांमधून किती लेखक-कवी अध्यक्ष किंवा सदस्यसपदी गेले? आमचेच राज्यकर्ते अखेर कुणाचे पाय धुऊन तीर्थ पितात? मंडळाच्या वर्तमान अध्यक्षांना विदर्भ आठवत नाही. ते पूर्ण महामंडळ कोकणात गाजवतात आणि आमच्या ठाले पाटलांच्या नावे बोटे मोडतात. कारण काय, तर त्यांनी अमेरिकेत पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन घेऊन ते यशस्वी केले. महाबळेश्वर संमेलनाचे अध्यक्ष आमचेच डॉ. आनंद यादव यांनी संतसूर्य तुकारामांबद्दल क्षमा मागून ग्रंथ मागे घेतला. ग्रंथ कसा काय मागे घेतला जातो, हे मला कळत नाही.
अलीकडे या देशात चर्चसारख्या शांत प्रार्थनामंदिरांवर धर्माध शक्तींकडून जे हल्ले होत आहे, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाला माणूसपण शिकविले, त्याला क्रुसावर निष्ठुरपणे ठोकणाऱ्या मारेकऱ्यांना त्याने माफ केले. असा महाकारुणिक महापुरुष, त्याच्याच प्रार्थनाघरांवर हे नादान हल्ले करताहेत, ही मानवी इतिहासात शरमेने मान खाली झुकवणारी घटना आहे. प्रभू येशू याही हल्लेखोरांना माफच करणार आहे पण, त्यांची मने मानवी असतील तर ते अखेर पश्चातापद:ग्ध होतीलच.
जय जिजाऊ

ऐसा महाकवीचा गाव!
वसंत वाहोकार

कब्रितला समाधिस्थ म्हणा, देवदूत म्हणा, नाहीतर मोकाट ग्रहांचा फकीर म्हणा, ते


गायधनीच.
‘माझी कविता शब्दांची लेकुरे कुशीत घेऊन
निर्वासितांच्या छावनीत एकटीच बसली आहे.’
ही सुधाकर गायधनींची कविता! डॉ. द.भि. कुलकर्णी म्हणतात तशी ही कविता, ‘गायधनींची कविता ही केवळ ‘मी’ची किंवा समाजाची किंवा वेदनेची किंवा निसर्गाची कविता नाही. ती या साऱ्यांमधील मूलभूत संबंधाचा वेध घेण्याचा प्रयत्न ही कविता करते? म्हणूनच ती निर्वासितांच्या छावनीत ेएकटीच बसलेली दिसते.
एका कवीचं सुजाणपण येण्याच्या ऐन वयात गायधनींचा पहिला कवितासंग्रह आला, तो ‘कब्रितला समाधिस्त.’ या संग्रहाने उभ्या मराठीचे आणि महाराष्ट्रातील तमाम नामवंतांचे लक्ष्य आपल्याकडे वेधले आणि कवी म्हणून गायधनींनी- आपली नाममुद्रा पक्की केली.
फार तर असे म्हणता येईल की, हा झाला इतिहास. आता तो मागे म्हणजे, फार मागे पडला. निदान पस्तीस एक वर्षे तरी.
‘चंदनाची चंद्रकोर
चहुवार ब्रह्म डोले
रूप पाणियात न्हाले
अंतरंग चिंब ओले.’
अशी कविता गायधनीच लिहीत होते. कविश्रेष्ठ मर्ढेकरांचे जे सामथ्र्य होते आणि त्यांची अफाट प्रतिमासृष्टी थक्क करीत होती, तिथवर गायधनी पोहोचल्याचे संकेत अशा कवितांमधून सहज मिळत होते.
हे सामथ्र्य नरहर कुरुंदकरांनाही जाणवले होते, म्हणूनच त्यांनी ‘समाधिस्थ’ बद्दल लिहिताना कवीला लिहिले होते, ‘सुर्वे यांच्या पहिल्या संग्रहापेक्षा तुमचा पहिला संग्रह चांगला व दमदार आहे. सुर्वे यांच्या दुसऱ्या संग्रहापेक्षा तुमचा दुसरा संग्रह सामथ्र्यशाली व्हावा या भावनेने मी हे लिहिले आहे. खोटी औपचारिक स्तुती करण्यापासून मी स्वत:ला शक्यतो दूर ठेवतो. कुरुंदकरांचे ते अपेक्षित नंतर या कवीला सहजपणे साध्य झाले.
कविता दमदार आणि जोमदार असली तरी तिला थोरामोठय़ांचे आशीर्वाद आणि प्रशस्तीपत्रे लागत होतीच. कवीला ती मोठय़ा प्रमाणात लाभली. ते मान्य करतीलच. परंतु, बरेचदा या प्रशस्तीपुरात कविता आणि कवी दोघेही वाहून जातात, हेलकावे खातात. मग गायधनींचे काय झाले? गायधनींनी काय वाटेल ते केले असेल.. थोरामोठय़ांना शिव्याही घातल्या असतील.. ‘अशा शेकडोंनी कविता मी काखा खाजवून पाडून टाकतो’ एवढी तीव्र-संतापाची भाषाही वापरली असेल किंवा गीत-भावगीत लेखनाबद्दल बोलताना शौचालयातील सहजनिर्मिती असे डंखही मारले असतील.. परंतु त्या दर्पात न अडकता आपली कविता राखली-सकस केली. तिथे बळ सर्वागाने एकवटून ठेवले.
प्रसंगी थोरामोठय़ांना उपहासाने नाकारले- फटकारले- ती त्यांची कलंदरी बाजूस ठेवली तरी, कवी म्हणून घडत जाणे आणि मोठय़ा नामावलीत समाविष्ट होण्यासाठी नेटाने-जिद्दीने पुढे जात राहाणे, हे सच्चेपण तरी मान्य केलेच पाहिजे. खरे आहे ना हे सुधाकरराव?
‘पावसाची गाणी गात राहिल्याने
पाऊस फिदा होत नाही
आकाश भाडय़ाने घेऊ पाहाणाऱ्यांनो..
सौदा पावसाचा होत नाही.’
या ओळींमधला तिरकस आशय, खणखणीत इशारा कुणीही मराठी वाचक, कवितेचा अस्सल आस्थेवाईक लक्षात घेईलच आणि तरीही जी माती गायधनींची म्हणून आहे.. तिचा गंध त्याला वेड लावेलच लावेल.
कब्रितला समाधिस्थ, देवदूत, मोकाट ग्रहांचा फकीर, गोफणगोटा, महावाक्य, हे सर्व कवी सुधाकर गायधनींचे कवितासंग्रह, ‘देवदूत’ बद्दलच्या अपेक्षा फार मोठय़ा होत्या आणि सगळ्यांचे लक्ष तिकडे लागले होते. सामाजिक दंभाचा स्फोट करणारी ही कविता होती..
‘या वस्तीतील लोकांचे हात चंद्रापर्यंत पोहोचले असते तर, त्यांनी चंद्रच भाकरीसारखा खुडून खुडून खाऊन टाकला असता
इतकी भेदून जाते. या पोटाची आग’
हे चिंतन या कवीमुळे आम्हाला समजले.. ते कुठून आले आणि कसे आले. चिंतन-तत्त्वज्ञानातील रूक्षता ओलांडून तरल-तादात्म्याने आशयाशी भीडणे गायधनींना कसे शक्य झाले?
‘समुद्र उपसून काढावा लागतो तळगाभ्यातून
जशी माऊली आतडे उपसून
हलकी होते, लेकरू पाहून.’
महाकवी तुकारामांच्या प्रेमात, जख्ख बंधनात गायधनी आहेत. म्हणूनच तो लडिवाळपणा गायधनींना सहज प्राप्त झाला. अभंगांशी अधिक जवळिकीचे नाते सांगणारी कविता हा कवी सहज-सुकर लिहून जातो. गायधनींची कविता समीक्षेच्या तोलकाटय़ावर उपेक्षित राहिली. ती वाचकप्रिय झाली. रसिकांनी डोक्यावर घेतली.. पण अस्सल मराठी समीक्षेने तिला दूरच ठेवले इथपासून तर सुधाकर गायधनी हे कवी आहेत.. महाकवी वगैरे सारे खोटे आहे इथपर्यंत अनेक प्रकारचे वाद-प्रवाद वेळोवेळी उठत राहिले. गायधनी त्यात अडकले नाहीत, त्यांनी पर्वाही केली नाही. मैत्रीत वा खाजगी संभाषणात एकेकाची जाडाझडतीही घेतली. जागाही दाखवून दिली आणि जराही विचलित न होता आपले वल्हें सांभाळून होडी वल्हवित गेले. कवी किंवा महाकवी म्हणून जेवढी चर्चा झाली त्यापेक्षाही जास्त चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीच अधिक झाली. त्या चर्चेत त्रयस्थ कमी आणि मित्र, हितचिंतक अधिक होते, हे मोठय़ा मनाने गायधनीही मान्य करतील, कारण माणसांचा-व्यक्तींचा त्यांचा व्यासंग भक्कम आहे. निर्विवाद.
‘रायबाई भुलाबाई’ ‘प्रेषितांचे बेट’ सारखी विशेष नाटके याच कवीने लिहिली-गाजवली. मराठी आणि महाराष्ट्राची सीमा ओलांडून पुढे नेली. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांनी काय केले नाही? समीक्षणे आणि संपादन केले तसेच सदरलेखनही केले. एका मोठय़ा वृत्तपत्राशी ते जुळलेले होते, वषरेन्वर्षे राबत होते. वस्तुस्थिती काय असेल ती असेल पण ती ‘नेमबाजी’ सुद्धा कधीतरी उलटली.. आणि गायधनी आजाद झाले. ‘घरठाव’ हा शब्द सहज वापरला जाईल असा हा कवी नाही. मात्र, त्यांनी दुसरे घर केले आणि तिथेही आपल्या लेखणीचे धारदार शस्त्र परजून ठेवले.. वर्तमानाचे नंगधडंगपण अधिकाधिक उजळ केले. कधीही कोण्या व्यक्तीची, संस्थेची, संस्थेतील मान्यवरांची पर्वा केली नाही आणि गयही केली नाही. प्रसंगी यश पदरात पडले नसेल परंतु आपला लढवय्या बाणा कधी सोडला नाही. अशावेळी दूर जाणाऱ्यांची संख्या होती त्यापेक्षा अधिक संख्या जवळ येणाऱ्यांची होती, हा अनुभव वाटय़ाला यावा असा हा विरळाच अवलिया म्हणावा लागेल. अधूनमधून, सदर लेखनांतून त्यांना फटकारले गेले, चिमटे काढल्या गेले क्वचित् उपेक्षिल्याही गेले.. गायधनींनी या कशाला कधीच भीक घातली नाही.
‘तोलून मापून शब्द योजावावा
वाक्ये गाजवावा। अर्थभरे’
हा वसा गायधनींच्या कवितेने घेतला तो कधी सोडला नाही आणि एका विशिष्ट तरल-चिंतन अवस्थेत नाद-लय साकारत राहिली.
‘महावाक्य’ हे ‘महाकाव्य’ आहे तो वादाचा विषय असू शकत नाही.
‘जैसा जलाशय काठोकाठ
तैसा तुडुंब आशयमाठ’
असे मराठीपण आणि मराठीमन खच्चून भरलेली नवनवोन्मेजशालिनी कविता लिहिणे-लिहीत जाणे या कविला शक्य झाले आणि होईलही.
‘फोडणीला तेल नाही
दिव्यात कुठे घालू?
फाटलेल्या लुगडय़ाला
हसे पैठणीचा शालू.’
यातला तिरकस आशय आपण लक्षात घेतला तर.. तर कविवर्य सुधाकर गायधनी हे काय जालिम रसायन आहे हे कळेलच कळेल. मात्र, त्यासाठी आपले मन तेवढेच स्वच्छ-नितळ-स्फटिक असावे ना?
सुधाकर गायधनींना या आयुष्यात काय नाही मिळाले? काय काय नाही मिळाले? ते जगजाहीर आहे. मग ती पारितोषिके-बक्षीसे-सत्कार, सन्मान असतील किंवा साहित्य संमेलनांची अध्यक्षपदंही असतील, सारे भरभरून मिळाले. रसिकांचे अपार प्रेम लाभले.. आणि श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद सावलीच्या झाडांसारखा रस्ताभर होताच होता. त्यांची कविता भाषांतर-अनुवादातून परमुलखात पोहोचली.. परभाषेत गाजली.. ‘महाकवी सुधाकर गायधनी विशेषांक’ देखील मराठी रसिकांच्या पदरात पडले. आजचा हा सन्मान आणि हे अध्यक्षपद या गावाने, या मित्रपरिवाराने, या सग्यासोयऱ्यांनी त्यांना बहाल केले.. त्या अध्यक्षपदाचा सन्मानच झाला. सुधाकरराव! तुमचे खुल्या दिलाने स्वागत आणि मन:पूर्वक अभिनंदन! तुम्ही स्वीकारले तरी.. आणि नाकारले तरीही.

तुकारामांचा विचार समाजाला कळला पाहिजे -शिवराज महाराज
पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नागपूर, २३ मे / प्रतिनिधी

सर्व संतांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान स्वीकारले असून बुद्धाच्या विचारांचा कळस तुकारामांच्या


विचारात दिसून येतो. म्हणूनच तुकोबारायांचा विचार समाजाला कळला पाहिजे, अशी कळकळ पंढरपूरच कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी हे होते.
याप्रसंगी शिवराज महाराज यांनी हिंदूू धर्मातील अनिष्ठ प्रथा-परंपरा, अंधश्रद्धांवर कठोर टीका करून संत तुकारामांचा डोळस विचार स्वीकारण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा नेहमीच प्रथा-परंपरांना बळी पडलेला आहे. त्यामुळे तो अजूनही गाफिल आहे. हिंदू धर्मातील भाकडकथांना संतांनी विरोध केला. पण, अजूनही समाजाचे डोळे उघडत नाहीत. लोकांना ज्ञानेश्वर चालत नाही पण, व्यास चालतो. यामागची कारणमीमांसा मात्र त्यांना माहित नसते. आनंद यादवांनी तुकोबांविरुद्ध लिहिले तेव्हा त्यांना आम्ही विरोध केला. त्यावर मोठा गजहब झाला. अशीच टीका यादवांनी संत ज्ञानेश्वरांवरही केली आहे पण, ते पुस्तक कुठे गायब झाले, याचा पत्ताही लागला नाही. कल्पनेप्रमाणे वाहत जाणारे साहित्य समाजाला नको आहे तर समाजाचे खरे चित्रण करणारे साहित्य हवे आहे. तुकोबांनी पोटाकरिता धर्म सांगणाऱ्यांवर प्रहार केला पण, तुकोबाराय समाजाला कळले नाहीत. त्यांचा विचार पुढे नेताना विरोध करणाऱ्याचे तोंड बंद करण्याची हिंमत मराठय़ांनी दाखवली पाहिजे. त्यासाठी मराठय़ांनी एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन शिवराज महाराज यांनी केले. यावेळी शिवराज महाराज यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी चवथ्या मराठा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी सुधाकर गायधनी यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे तसेच ना.गो. थुटे, प्रा. अशोक राणा, डॉ. दिलीप धापके यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
विचारमंचावर जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, आयकर सहआयुक्त पल्लवी दराडे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर, इतिहासकार मा.म. देशमुख, सुमती धनवटे, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, प्रदेश सचिव विजय ठुबे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष जयश्री शेळके, रेव्हरंड नितीन सरदार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे, पुरुषोत्तम कडू, प्रशांत कोहळे, अनंत सोमदे हे उपस्थित होते. संचालन लीना निकम आणि विजया मारोतकर यांनी केले. स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जिजाऊ वंदना विजया कोकाटे यांनी सादर केली. प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले.
क्षणचित्रे
खास शिवकालीन परंपरेनुसार तुतारी वाजवून समारंभाला प्रारंभ झाला.
सिंदखेड राजा येथील जिजाऊ शिवसृष्टीसाठी मराठा सेवा संघ नागपूर शाखेतर्फे मधुकर मेहकरे यांनी अकरा लाख रुपयांचा लाखांचा धनादेश पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सुपूर्द केला.
यावेळी यंदा आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेली शीतल उगले हिचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके येणार म्हणून दिवसभर चर्चा होती पण, ते आले नाहीत. कुलगुरू श.नू. पठाणही हजर नव्हते.
शिवराज महाराज यांनी श्रोत्यांची नस पकडून मिश्किल पण, आग्रही शैलीत भाषण केल्याने त्यांना मोठा प्रतिसाद लाभला.
उद्घाटनच उशिरा झाल्याने अन्य कार्यक्रमांनाही उशिरा सुरुवात झाली. मराठा समाजाच्या वकुबाला शोभेलशी अपेक्षित गर्दी संमेलनाला होऊ शकली नाही.

तुकारामांचा विचार समाजाला कळला पाहिजे -शिवराज महाराज
पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नागपूर, २३ मे / प्रतिनिधी

सर्व संतांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान स्वीकारले असून बुद्धाच्या विचारांचा कळस तुकारामांच्या


विचारात दिसून येतो. म्हणूनच तुकोबारायांचा विचार समाजाला कळला पाहिजे, अशी कळकळ पंढरपूरच कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी हे होते.
याप्रसंगी शिवराज महाराज यांनी हिंदूू धर्मातील अनिष्ठ प्रथा-परंपरा, अंधश्रद्धांवर कठोर टीका करून संत तुकारामांचा डोळस विचार स्वीकारण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा नेहमीच प्रथा-परंपरांना बळी पडलेला आहे. त्यामुळे तो अजूनही गाफिल आहे. हिंदू धर्मातील भाकडकथांना संतांनी विरोध केला. पण, अजूनही समाजाचे डोळे उघडत नाहीत. लोकांना ज्ञानेश्वर चालत नाही पण, व्यास चालतो. यामागची कारणमीमांसा मात्र त्यांना माहित नसते. आनंद यादवांनी तुकोबांविरुद्ध लिहिले तेव्हा त्यांना आम्ही विरोध केला. त्यावर मोठा गजहब झाला. अशीच टीका यादवांनी संत ज्ञानेश्वरांवरही केली आहे पण, ते पुस्तक कुठे गायब झाले, याचा पत्ताही लागला नाही. कल्पनेप्रमाणे वाहत जाणारे साहित्य समाजाला नको आहे तर समाजाचे खरे चित्रण करणारे साहित्य हवे आहे. तुकोबांनी पोटाकरिता धर्म सांगणाऱ्यांवर प्रहार केला पण, तुकोबाराय समाजाला कळले नाहीत. त्यांचा विचार पुढे नेताना विरोध करणाऱ्याचे तोंड बंद करण्याची हिंमत मराठय़ांनी दाखवली पाहिजे. त्यासाठी मराठय़ांनी एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन शिवराज महाराज यांनी केले. यावेळी शिवराज महाराज यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी चवथ्या मराठा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी सुधाकर गायधनी यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे तसेच ना.गो. थुटे, प्रा. अशोक राणा, डॉ. दिलीप धापके यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
विचारमंचावर जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, आयकर सहआयुक्त पल्लवी दराडे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर, इतिहासकार मा.म. देशमुख, सुमती धनवटे, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, प्रदेश सचिव विजय ठुबे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष जयश्री शेळके, रेव्हरंड नितीन सरदार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे, पुरुषोत्तम कडू, प्रशांत कोहळे, अनंत सोमदे हे उपस्थित होते. संचालन लीना निकम आणि विजया मारोतकर यांनी केले. स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जिजाऊ वंदना विजया कोकाटे यांनी सादर केली. प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले.
क्षणचित्रे
खास शिवकालीन परंपरेनुसार तुतारी वाजवून समारंभाला प्रारंभ झाला.
सिंदखेड राजा येथील जिजाऊ शिवसृष्टीसाठी मराठा सेवा संघ नागपूर शाखेतर्फे मधुकर मेहकरे यांनी अकरा लाख रुपयांचा लाखांचा धनादेश पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सुपूर्द केला.
यावेळी यंदा आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेली शीतल उगले हिचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके येणार म्हणून दिवसभर चर्चा होती पण, ते आले नाहीत. कुलगुरू श.नू. पठाणही हजर नव्हते.
शिवराज महाराज यांनी श्रोत्यांची नस पकडून मिश्किल पण, आग्रही शैलीत भाषण केल्याने त्यांना मोठा प्रतिसाद लाभला.
उद्घाटनच उशिरा झाल्याने अन्य कार्यक्रमांनाही उशिरा सुरुवात झाली. मराठा समाजाच्या वकुबाला शोभेलशी अपेक्षित गर्दी संमेलनाला होऊ शकली नाही.