Monday, November 9, 2009

<span title="Click to correct" class="transl_class" id="0"><span title="Click to correct" class="transl_class" id="0">जळगावमध्ये</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="1"><span title="Click to correct" class="transl_class" id="1">राज्यस्तरीय</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="2"><span title="Click to correct" class="transl_class" id="2">मराठा</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="3"><span title="Click to correct" class="transl_class" id="3">साहित्य</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="4"><span title="Click to correct" class="transl_class" id="4">संमेलन</span></span>
जळगावमध्ये राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन Print
वार्ताहर / जळगाव
मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराया साहित्य परिषदेतर्फे येथे ३१ ऑक्टोबर तर दोन नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे प्रा. जैमिनी कडू यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून खा. ए. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी सुरू असल्याची माहिती सचिव प्रा. दिलीप चौधरी यांनी दिली आहे.
मराठा बहुजन समाजाचे सांस्कृतिकरण व्हावे, त्यातून अखिल विश्वासातील मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न व्हावे या विश्वकल्याणाच्या भावनेतून तुकोबाराया साहित्य परिषदेतर्फे जळगाव जिल्हा बँकेच्या सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुख डॉ. ऑम्वेट यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलन स्थळाला ‘क्रांतिवीरांगना कॅप्टन लिला पाटील साहित्य नगरी’ नाव देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
३१ ऑक्टोबर रोजी साहित्यदिंडी तसेच नवोदितांचे कवी संमेलन चंद्रपूरचे प्रा. दिलीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. एक नोव्हेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ तसेच महापरिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाजातील १९ प्रमुख प्रतिनिधी आपली भूमिका मांडणार आहेत. सत्यशोधक साहित्याचे डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. दोन नोव्हेंबर रोजी ‘शिकलेल्यांना अधिक समाजाभिमुख करण्यासाठी आवश्यक साहित्याचा आराखडा’ विषयावर डॉ. शरणकुमार लिंबाळे, रजनी ठाकूर, प्रदिप साळुंखे आणि सहित्यिक शरद पाटील यांची प्रकट मुलाखत तसेच स्त्री साहित्यातील कृषी संवेदना या विषयावर परिसंवाद होईल. संत साहित्यातील धार्मिक व सामाजिक चित्रे या परिसंवादाने संमेलनाचा समारोप होईल. बहुजन साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे







<span title="Click to correct" class="transl_class" id="0">मराठा</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="1">साहित्य</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="2">हेच</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="3">मुळात</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="4">मराठी</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="5">साहित्य</span>- <span title="Click to correct" class="transl_class" id="6">जैमिनी</span> <span title="Click to correct" class="transl_class" id="7">कडू</span>
मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य- जैमिनी कडू
जळगाव, २ नोव्हेंबर / वार्ताहर
मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य आहे, तसेच मराठी ही भाषा मुळात मराठा असून भाषा हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने मराठा भाषा असे संबोधले जात नाही, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी येथे केले. येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. गेल ऑमवेट यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू यांनी मराठा साहित्य, मराठी भाषा अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. शैला जैमिनी, खा. ए. टी. पाटील, आ. संजय सावकारे, मराठा सेवा संघाचे अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर, नेताजी गोरे, सुधीर सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता ढिकले, प्रविण गायकवाड, रामनाथ सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्याप्रमाणे गुजराथी, पंजाबी, बंगाली, बिहारी, कानडी, आसामी, चीनी, जर्मनी भाषांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो, त्याप्रमाणे मराठा भाषा ऐवजी मराठी भाषा असा उल्लेख करण्यात येतो.
मराठा व मराठी हे शब्द जातवाचक नसून ते भाषा वाचक, प्रांत वाचक असल्याचे प्रा. कडू यांनी सांगितले.
ज्या भौगोलिक प्रदेशात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेवरूनच भारतात प्रांतरचना झाली. परंतु प्रांतरचना भाषेवरून करताना राजकारण्यांनी मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील अनेक मराठी भाषिक गावे महाराष्ट्राला जोडण्याचा मोठा गुन्हा केला असून त्याची फळे आज आपण भोगत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा साहित्यिकांना डावलण्याचे कारस्थान वर्षांनुवर्षे सुरूच असून सोप्या भाषेत मराठी जनांना जगण्याची व्याख्या सांगणाऱ्या तुकोबांनाही या दिव्यातून जावे लागले, तसेच एकूणच मराठी साहित्यावर ब्राह्मणीकरणाचा प्रभाव दिसून येत आहे, असे मत डॉ. गेल यांनी मांडले. ‘परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा समन्वय आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक साहित्य परिषदेचे प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर हे होते. डॉ. गेल यांनी प्रस्थापितांविरुद्ध तोफ डागली. मराठी संत साहित्यात असलेले ब्राम्हणीकरणावर त्यांनी हल्ला चढविला. तुकोबांना गुरूची गरज नव्हती असे सांगत त्यांनी ‘ईडा पिडा जावो व बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना त्यांनी केली.

मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य- जैमिनी कडू Print
जळगाव, २ नोव्हेंबर / वार्ताहर
मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य आहे, तसेच मराठी ही भाषा मुळात मराठा असून भाषा हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने मराठा भाषा असे संबोधले जात नाही, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी येथे केले. येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. गेल ऑमवेट यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू यांनी मराठा साहित्य, मराठी भाषा अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. शैला जैमिनी, खा. ए. टी. पाटील, आ. संजय सावकारे, मराठा सेवा संघाचे अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर, नेताजी गोरे, सुधीर सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता ढिकले, प्रविण गायकवाड, रामनाथ सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्याप्रमाणे गुजराथी, पंजाबी, बंगाली, बिहारी, कानडी, आसामी, चीनी, जर्मनी भाषांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो, त्याप्रमाणे मराठा भाषा ऐवजी मराठी भाषा असा उल्लेख करण्यात येतो.
मराठा व मराठी हे शब्द जातवाचक नसून ते भाषा वाचक, प्रांत वाचक असल्याचे प्रा. कडू यांनी सांगितले.
ज्या भौगोलिक प्रदेशात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेवरूनच भारतात प्रांतरचना झाली. परंतु प्रांतरचना भाषेवरून करताना राजकारण्यांनी मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील अनेक मराठी भाषिक गावे महाराष्ट्राला जोडण्याचा मोठा गुन्हा केला असून त्याची फळे आज आपण भोगत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा साहित्यिकांना डावलण्याचे कारस्थान वर्षांनुवर्षे सुरूच असून सोप्या भाषेत मराठी जनांना जगण्याची व्याख्या सांगणाऱ्या तुकोबांनाही या दिव्यातून जावे लागले, तसेच एकूणच मराठी साहित्यावर ब्राह्मणीकरणाचा प्रभाव दिसून येत आहे, असे मत डॉ. गेल यांनी मांडले. ‘परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा समन्वय आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक साहित्य परिषदेचे प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर हे होते. डॉ. गेल यांनी प्रस्थापितांविरुद्ध तोफ डागली. मराठी संत साहित्यात असलेले ब्राम्हणीकरणावर त्यांनी हल्ला चढविला. तुकोबांना गुरूची गरज नव्हती असे सांगत त्यांनी ‘ईडा पिडा जावो व बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना त्यांनी केली.
शोषणविरोधी मूलतत्त्वाने संघटित होण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 01, 2009 AT 11:00 PM (IST)

जळगावात मराठा साहित्य संमेलनाचे थाटात उद्‌घाटन

जळगाव - महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याची शिक्षण व्यवस्था, शिक्षणाचे धोरण बहुजनांच्या हाती दिले असते, तर राज्यात ज्या जाती- जातींच्या भिंती आहेत, त्या राहिल्या नसत्या. त्या दूर करण्यासाठी प्रत्येकाने वाचनसंस्कृती वाढविली पाहिजे. संमेलनातून समतावादी व समन्वयवादी धोरणाची अपेक्षा आहे. आपण सर्व शोषणविरोधी समतावादी मूलतत्त्वाने संघटित झाले, तर एक उज्ज्वल भवितव्य निर्माण करण्याचे श्रेय आम्हाला निश्‍चितच घेता येणार आहे, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी आज येथे केले.

येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे रविवारी सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन क्रांती वीरांगना कॅप्टन लीला पाटील साहित्यनगरीत डॉ. गेल ऑमवेट (नवी दिल्ली) यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू बोलत होते. कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रतीकात्मक नांगरावर पुष्प उधळून जिजाऊंच्या जय जयकारात उद्‌घाटन झाले. या वेळी लॅपटॉप, लेखणी ठेवण्यात आली.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर व ऍड. पुरुषोत्तम खेडेकर, खासदार ए. टी. पाटील, महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे, आमदार संजय सावकारे, परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे, सौ. शैल जैमिनी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा ढवळे, मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष इंजिनिअर नेताजी गोरे, ब्रिगेडिअर सुधीर सावंत, "शिवधर्मा'चे देवानंद कापसे, शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील- भोयर, संघाचे प्रदेश सचिव विजयकुमार ढुगे, परिषदेचे महाराष्ट्र सचिव प्रा. दिलीप चौधरी, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पाटील व्यासपीठावर होते.

प्रा. कडू म्हणाले, की महाराष्ट्र स्थापनेनंतर शिक्षणाची धोरणे तयार करण्याची जबाबदारी बहुजनांना कमी लेखणाऱ्यांच्या हातात गेली. त्यांनी बहुजनांना कमी लेखून बहुजनांचा विकास न होता, ते आपल्याच आधिपत्याखाली कसे राहतील याचा विचार केला. त्याचे वास्तव चित्र समाजासमोर येऊ दिले नाही. यामुळे आज सांस्कृतिक विचारांची दरी निर्माण झाली. त्यास आपण सर्व दोषी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो, तेव्हा आजची पिढी शिवाजी महाराजांचे नाव ठीक आहे. मात्र, इतरांचे काय, असा प्रश्‍न करतात. या विचारांच्या दरीला शैक्षणिक धोरण जबाबदार आहे. बाराखडीतला "भ' भटजीचाच का शिकविला गेला, भोवऱ्याचा का नाही?, "ग' गणपतीचा का शिकविला गेला, गवताचा का नाही?

ते म्हणाले, की सर्व महापुरुषांचे विचार आपण समजून घेतले, तरच जीवन कळणार आहे. पाच हजार वर्षांपासून जो माणूस आहे, त्याला सामाजिक प्रतिष्ठा त्याला नाही. ती प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आमची धडपड आहे. शोषणाचा विरोध व समतेची स्थापना, हे आमचे ध्येय आहे. भगवान गौतम बुद्धांनी मनाचा विचार करून धम्म सांगितला.

मराठा साहित्य समजून घ्यावे

मराठी भाषा ही मुळात मराठा भाषा आहे. भाषा हा शब्द स्त्रीलिंगी असल्याने "मराठा भाषा' असे संबोधिले जात नाही. मराठा- मराठी हे शब्द जात-वाचक नसून, ते भाषावाचक, प्रांतवाचक आहेत. आम्हाला आमचे अस्तित्व निर्माण करायचे आहे. आमचा माणूस आम्हाला मोठा करायचा आहे. जोपर्यंत ही भावना आपल्यात भिनत नाही, तोपर्यंत ब्राह्मणवाद्यांचा विजय होणारच आहे. आजची युवापिढी व आपल्यात असलेली सांस्कृतिक दरी कमी करून समाजाला वाचवायचे असेल, तर मराठा साहित्य हे समजून घेतले पाहिजे. आमच्यात न्यूनगंडाची भावना आहे, ती काढून टाकली पाहिजे. समतावादी- समन्वयवादी धोरणाची अपेक्षा आहे. आम्ही जी भूमिका घेऊन कार्यरत झालो आहोत, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मराठा साहित्यिकांनी, लेखकांनी याबदलाकडे अधिक परिणामकारक रीतीने पाहिले पाहिजे.

या वेळी उद्‌घाटक डॉ. ऑमवेट, परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. खंदारे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरे, आयुक्त सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. लीलाधर पाटील, रामचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साहित्यिक जयसिंग वाघ यांनी परिचय करून दिला.

मराठा आरक्षणासाठी बहुजनांनी सक्रिय सहभागी होण्याची गरज
मराठा सेवा संघप्रणित पाचवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे शनिवारी



नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांच्या अध्यक्षीय भाषणाचे संपादित अंश.
पाचवे अ.भा. मराठा साहित्य संमेलन, नागपूर येथे आयोजित करून आपण फार मोठे औचित्य साधले आहे. आपण संमेलनाच्या आवतणात म्हटल्याप्रमाणे, ‘मराठीतील पहिल्या नागवंशीय मानवाच्या साहित्याची आठवण ठेवणे खरोखरच अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राला मराठी भाषा आणि मराठी वाड्:मय याची जाण आणि भान विदर्भातल्या नागभूमीने करून देऊन विश्वापुढे एक अलौकिक जीवनयात्रा म्हणून साहित्याचा प्रक्षेप उभा केला आहे. हेच वैश्विक मराठा साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे सूत्र आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर, अखिल विश्वात जेथे जेथे म्हणून मराठा माणूस पोहोचत आहे, त्यांच्या संबंधाचा आलेख हा परंपरा आणि वर्तमान यांना साधणाऱ्या वाड्:मयाचा प्रवास करतो. याच भूमिकेतून या संमेलनाचे आयोजन केले आहे.
संत शिरोमणी तुकोबारायांचा विषय निघाला की, गाथेचे तरंगणे आणि वैकुंठगमन हे मुद्दे आलेच. गाथेचा इतिहास आपणास ठाऊकच आहे. तुकोबारायांचा सखा आणि टाळकरी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या अथक प्रयत्नामुळे गाथा पुन:निर्मित झाली.
बरे झालो देवा कुणबी झालो
अन्यथा असतो दंभे मेलो
कुणबी म्हणजे शेतात सहकुटुंब राबराब राबून तिथेच घर-झोपडं बांधून जीवन कंठणारा अन्नदाता, अर्थात, शेतकरी इतका व्यापक अर्थाने कुणब्याचा अर्थ विस्तारतो. ‘कुणब्यासारखा दाता नाही’ म्हणतात पण, आज हाच अन्नदाता अन्नान्न स्थितीत आलेला आहे. असो आता इथे आपला मुद्दा संत तुकोबांच्या वैकुंठगमनाचा आहे. आजही महाराष्ट्राच्या विद्यापीठांमध्ये शालेय अभ्यासक्रमांमध्ये महाराजांचे वैकुंठगमन झाल्याचेच शिकविले जात आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. वारकरीवर्ग भक्तिभावनेतून वैकुंठगमनाच्या बाजूने असला म्हणून हे सत्य इंद्रायणीच्या डोहातच तळमळत ठेवणे कितपत योग्य?
आज मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यासाठी मराठा आरक्षणाच्या दृष्टीने याचा नीट अभ्यासपूर्ण लेखाजोखा आपणास मांडावयाचा आहे. मराठा हा स्वराज्यासाठी लढत राहिलेला समाज आहे. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा आदर करतो. त्यांना अन् त्यांच्या वारसदारांना अनेक सवलतींचा लाभ देतो, मग हाच निकष स्वराज्यासाठी लढणाऱ्या मराठय़ांसाठी का नाही? मराठा संज्ञेत त्यावेळी मोडणाऱ्या अठरापगड जातींपैकी अनेक जाती-जमातींना सवलतींचा लाभ झालेला आहे. आज खुद्द विदर्भ-नागपूरकडील मराठय़ांची दुरावस्था कशी आहे, हे आरक्षण विरोधकांना ठाऊक आहे का? इथे राजे शिर्के सायकलच्या पंक्चरचं दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. पुण्या-मुंबईकडे शेकडोंनी मराठा बांधव माथाडी हमालाचे आणि रिक्षाचालकाचे काम करतात. दीड टक्के मराठा लोक राज्यकर्ते झाले म्हणून उर्वरित लोकही पुढारले, असे म्हणणे हा कुठला युक्तिवाद? अकारण मराठय़ांच्या छातीत अंगार अन् मेंदूत वर्णवर्चस्वाचा पोकळ अहंकार आजवर भरवण्यात आला. आता कुठे मराठा सेवा संघाच्या प्रयत्नाने हे कोडं मोकळं होऊ लागलं आहे पण, मराठा आरक्षण परिषदेतही भाऊबंदकी सुरू होताना दिसते, हे क्लेशदायक आहे.
शेतकरी-कष्टकरी मराठा, आज आरक्षणप्राप्त जाती-जमातींच्या तुलनेत माघारलेला आहे. राजकारणी मराठय़ांना मागासवर्गात मोडणं आवडत नाही. ज्यांना समाजाचं मागासलेपण मान्य नाही, त्यांनी वाटल्यास आरक्षणाचा लाभ न घ्यावा पण, म्हणून इतरांच्या तोंडाचा घास हिसकू नये. कुणबी समाज ओबीसी असून मराठय़ांच्या आरक्षणासाठी पुढे आला. त्यामध्ये इतर बंधू बहुजनांनीही सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे.
शेतकरी हा बहुजन वर्गातलाच, आज शिवाजी राजे असते तर कदाचित एकाही किसानाची आत्महत्या झाली नसती. शेतकऱ्यांविषयी छत्रपती शिवरायांना अपार आस्था होती. त्यांनी स्वराज्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी केली होती. अशी ती तेव्हाची शिवशाही आणि अशी ही आजची लोकशाही! पण, आम्हा कास्तकारांना आज पुढारीही जोशीच निवडावा लागला. यापेक्षा विरोधाभास तो कोणता? ‘शिवधर्म’ नावाची जी धर्मक्रांती मराठा सेवा संघाने घडवून आणली, त्या क्रांतीची तुलना धम्मक्रांतीशी होऊ शकेल एवढय़ा मोलाचे ते कार्य आहे. शिवधर्माच्या प्रचारासाठी आता त्यागी आणि अभ्यासू प्रवक्ते आणि संघटकांची गरज आहे.
यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नांमुळे साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती झाली. यावर बहुजनांमधून किती लेखक-कवी अध्यक्ष किंवा सदस्यसपदी गेले? आमचेच राज्यकर्ते अखेर कुणाचे पाय धुऊन तीर्थ पितात? मंडळाच्या वर्तमान अध्यक्षांना विदर्भ आठवत नाही. ते पूर्ण महामंडळ कोकणात गाजवतात आणि आमच्या ठाले पाटलांच्या नावे बोटे मोडतात. कारण काय, तर त्यांनी अमेरिकेत पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन घेऊन ते यशस्वी केले. महाबळेश्वर संमेलनाचे अध्यक्ष आमचेच डॉ. आनंद यादव यांनी संतसूर्य तुकारामांबद्दल क्षमा मागून ग्रंथ मागे घेतला. ग्रंथ कसा काय मागे घेतला जातो, हे मला कळत नाही.
अलीकडे या देशात चर्चसारख्या शांत प्रार्थनामंदिरांवर धर्माध शक्तींकडून जे हल्ले होत आहे, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाला माणूसपण शिकविले, त्याला क्रुसावर निष्ठुरपणे ठोकणाऱ्या मारेकऱ्यांना त्याने माफ केले. असा महाकारुणिक महापुरुष, त्याच्याच प्रार्थनाघरांवर हे नादान हल्ले करताहेत, ही मानवी इतिहासात शरमेने मान खाली झुकवणारी घटना आहे. प्रभू येशू याही हल्लेखोरांना माफच करणार आहे पण, त्यांची मने मानवी असतील तर ते अखेर पश्चातापद:ग्ध होतीलच.
जय जिजाऊ

ऐसा महाकवीचा गाव!
वसंत वाहोकार

कब्रितला समाधिस्थ म्हणा, देवदूत म्हणा, नाहीतर मोकाट ग्रहांचा फकीर म्हणा, ते


गायधनीच.
‘माझी कविता शब्दांची लेकुरे कुशीत घेऊन
निर्वासितांच्या छावनीत एकटीच बसली आहे.’
ही सुधाकर गायधनींची कविता! डॉ. द.भि. कुलकर्णी म्हणतात तशी ही कविता, ‘गायधनींची कविता ही केवळ ‘मी’ची किंवा समाजाची किंवा वेदनेची किंवा निसर्गाची कविता नाही. ती या साऱ्यांमधील मूलभूत संबंधाचा वेध घेण्याचा प्रयत्न ही कविता करते? म्हणूनच ती निर्वासितांच्या छावनीत ेएकटीच बसलेली दिसते.
एका कवीचं सुजाणपण येण्याच्या ऐन वयात गायधनींचा पहिला कवितासंग्रह आला, तो ‘कब्रितला समाधिस्त.’ या संग्रहाने उभ्या मराठीचे आणि महाराष्ट्रातील तमाम नामवंतांचे लक्ष्य आपल्याकडे वेधले आणि कवी म्हणून गायधनींनी- आपली नाममुद्रा पक्की केली.
फार तर असे म्हणता येईल की, हा झाला इतिहास. आता तो मागे म्हणजे, फार मागे पडला. निदान पस्तीस एक वर्षे तरी.
‘चंदनाची चंद्रकोर
चहुवार ब्रह्म डोले
रूप पाणियात न्हाले
अंतरंग चिंब ओले.’
अशी कविता गायधनीच लिहीत होते. कविश्रेष्ठ मर्ढेकरांचे जे सामथ्र्य होते आणि त्यांची अफाट प्रतिमासृष्टी थक्क करीत होती, तिथवर गायधनी पोहोचल्याचे संकेत अशा कवितांमधून सहज मिळत होते.
हे सामथ्र्य नरहर कुरुंदकरांनाही जाणवले होते, म्हणूनच त्यांनी ‘समाधिस्थ’ बद्दल लिहिताना कवीला लिहिले होते, ‘सुर्वे यांच्या पहिल्या संग्रहापेक्षा तुमचा पहिला संग्रह चांगला व दमदार आहे. सुर्वे यांच्या दुसऱ्या संग्रहापेक्षा तुमचा दुसरा संग्रह सामथ्र्यशाली व्हावा या भावनेने मी हे लिहिले आहे. खोटी औपचारिक स्तुती करण्यापासून मी स्वत:ला शक्यतो दूर ठेवतो. कुरुंदकरांचे ते अपेक्षित नंतर या कवीला सहजपणे साध्य झाले.
कविता दमदार आणि जोमदार असली तरी तिला थोरामोठय़ांचे आशीर्वाद आणि प्रशस्तीपत्रे लागत होतीच. कवीला ती मोठय़ा प्रमाणात लाभली. ते मान्य करतीलच. परंतु, बरेचदा या प्रशस्तीपुरात कविता आणि कवी दोघेही वाहून जातात, हेलकावे खातात. मग गायधनींचे काय झाले? गायधनींनी काय वाटेल ते केले असेल.. थोरामोठय़ांना शिव्याही घातल्या असतील.. ‘अशा शेकडोंनी कविता मी काखा खाजवून पाडून टाकतो’ एवढी तीव्र-संतापाची भाषाही वापरली असेल किंवा गीत-भावगीत लेखनाबद्दल बोलताना शौचालयातील सहजनिर्मिती असे डंखही मारले असतील.. परंतु त्या दर्पात न अडकता आपली कविता राखली-सकस केली. तिथे बळ सर्वागाने एकवटून ठेवले.
प्रसंगी थोरामोठय़ांना उपहासाने नाकारले- फटकारले- ती त्यांची कलंदरी बाजूस ठेवली तरी, कवी म्हणून घडत जाणे आणि मोठय़ा नामावलीत समाविष्ट होण्यासाठी नेटाने-जिद्दीने पुढे जात राहाणे, हे सच्चेपण तरी मान्य केलेच पाहिजे. खरे आहे ना हे सुधाकरराव?
‘पावसाची गाणी गात राहिल्याने
पाऊस फिदा होत नाही
आकाश भाडय़ाने घेऊ पाहाणाऱ्यांनो..
सौदा पावसाचा होत नाही.’
या ओळींमधला तिरकस आशय, खणखणीत इशारा कुणीही मराठी वाचक, कवितेचा अस्सल आस्थेवाईक लक्षात घेईलच आणि तरीही जी माती गायधनींची म्हणून आहे.. तिचा गंध त्याला वेड लावेलच लावेल.
कब्रितला समाधिस्थ, देवदूत, मोकाट ग्रहांचा फकीर, गोफणगोटा, महावाक्य, हे सर्व कवी सुधाकर गायधनींचे कवितासंग्रह, ‘देवदूत’ बद्दलच्या अपेक्षा फार मोठय़ा होत्या आणि सगळ्यांचे लक्ष तिकडे लागले होते. सामाजिक दंभाचा स्फोट करणारी ही कविता होती..
‘या वस्तीतील लोकांचे हात चंद्रापर्यंत पोहोचले असते तर, त्यांनी चंद्रच भाकरीसारखा खुडून खुडून खाऊन टाकला असता
इतकी भेदून जाते. या पोटाची आग’
हे चिंतन या कवीमुळे आम्हाला समजले.. ते कुठून आले आणि कसे आले. चिंतन-तत्त्वज्ञानातील रूक्षता ओलांडून तरल-तादात्म्याने आशयाशी भीडणे गायधनींना कसे शक्य झाले?
‘समुद्र उपसून काढावा लागतो तळगाभ्यातून
जशी माऊली आतडे उपसून
हलकी होते, लेकरू पाहून.’
महाकवी तुकारामांच्या प्रेमात, जख्ख बंधनात गायधनी आहेत. म्हणूनच तो लडिवाळपणा गायधनींना सहज प्राप्त झाला. अभंगांशी अधिक जवळिकीचे नाते सांगणारी कविता हा कवी सहज-सुकर लिहून जातो. गायधनींची कविता समीक्षेच्या तोलकाटय़ावर उपेक्षित राहिली. ती वाचकप्रिय झाली. रसिकांनी डोक्यावर घेतली.. पण अस्सल मराठी समीक्षेने तिला दूरच ठेवले इथपासून तर सुधाकर गायधनी हे कवी आहेत.. महाकवी वगैरे सारे खोटे आहे इथपर्यंत अनेक प्रकारचे वाद-प्रवाद वेळोवेळी उठत राहिले. गायधनी त्यात अडकले नाहीत, त्यांनी पर्वाही केली नाही. मैत्रीत वा खाजगी संभाषणात एकेकाची जाडाझडतीही घेतली. जागाही दाखवून दिली आणि जराही विचलित न होता आपले वल्हें सांभाळून होडी वल्हवित गेले. कवी किंवा महाकवी म्हणून जेवढी चर्चा झाली त्यापेक्षाही जास्त चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीच अधिक झाली. त्या चर्चेत त्रयस्थ कमी आणि मित्र, हितचिंतक अधिक होते, हे मोठय़ा मनाने गायधनीही मान्य करतील, कारण माणसांचा-व्यक्तींचा त्यांचा व्यासंग भक्कम आहे. निर्विवाद.
‘रायबाई भुलाबाई’ ‘प्रेषितांचे बेट’ सारखी विशेष नाटके याच कवीने लिहिली-गाजवली. मराठी आणि महाराष्ट्राची सीमा ओलांडून पुढे नेली. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांनी काय केले नाही? समीक्षणे आणि संपादन केले तसेच सदरलेखनही केले. एका मोठय़ा वृत्तपत्राशी ते जुळलेले होते, वषरेन्वर्षे राबत होते. वस्तुस्थिती काय असेल ती असेल पण ती ‘नेमबाजी’ सुद्धा कधीतरी उलटली.. आणि गायधनी आजाद झाले. ‘घरठाव’ हा शब्द सहज वापरला जाईल असा हा कवी नाही. मात्र, त्यांनी दुसरे घर केले आणि तिथेही आपल्या लेखणीचे धारदार शस्त्र परजून ठेवले.. वर्तमानाचे नंगधडंगपण अधिकाधिक उजळ केले. कधीही कोण्या व्यक्तीची, संस्थेची, संस्थेतील मान्यवरांची पर्वा केली नाही आणि गयही केली नाही. प्रसंगी यश पदरात पडले नसेल परंतु आपला लढवय्या बाणा कधी सोडला नाही. अशावेळी दूर जाणाऱ्यांची संख्या होती त्यापेक्षा अधिक संख्या जवळ येणाऱ्यांची होती, हा अनुभव वाटय़ाला यावा असा हा विरळाच अवलिया म्हणावा लागेल. अधूनमधून, सदर लेखनांतून त्यांना फटकारले गेले, चिमटे काढल्या गेले क्वचित् उपेक्षिल्याही गेले.. गायधनींनी या कशाला कधीच भीक घातली नाही.
‘तोलून मापून शब्द योजावावा
वाक्ये गाजवावा। अर्थभरे’
हा वसा गायधनींच्या कवितेने घेतला तो कधी सोडला नाही आणि एका विशिष्ट तरल-चिंतन अवस्थेत नाद-लय साकारत राहिली.
‘महावाक्य’ हे ‘महाकाव्य’ आहे तो वादाचा विषय असू शकत नाही.
‘जैसा जलाशय काठोकाठ
तैसा तुडुंब आशयमाठ’
असे मराठीपण आणि मराठीमन खच्चून भरलेली नवनवोन्मेजशालिनी कविता लिहिणे-लिहीत जाणे या कविला शक्य झाले आणि होईलही.
‘फोडणीला तेल नाही
दिव्यात कुठे घालू?
फाटलेल्या लुगडय़ाला
हसे पैठणीचा शालू.’
यातला तिरकस आशय आपण लक्षात घेतला तर.. तर कविवर्य सुधाकर गायधनी हे काय जालिम रसायन आहे हे कळेलच कळेल. मात्र, त्यासाठी आपले मन तेवढेच स्वच्छ-नितळ-स्फटिक असावे ना?
सुधाकर गायधनींना या आयुष्यात काय नाही मिळाले? काय काय नाही मिळाले? ते जगजाहीर आहे. मग ती पारितोषिके-बक्षीसे-सत्कार, सन्मान असतील किंवा साहित्य संमेलनांची अध्यक्षपदंही असतील, सारे भरभरून मिळाले. रसिकांचे अपार प्रेम लाभले.. आणि श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद सावलीच्या झाडांसारखा रस्ताभर होताच होता. त्यांची कविता भाषांतर-अनुवादातून परमुलखात पोहोचली.. परभाषेत गाजली.. ‘महाकवी सुधाकर गायधनी विशेषांक’ देखील मराठी रसिकांच्या पदरात पडले. आजचा हा सन्मान आणि हे अध्यक्षपद या गावाने, या मित्रपरिवाराने, या सग्यासोयऱ्यांनी त्यांना बहाल केले.. त्या अध्यक्षपदाचा सन्मानच झाला. सुधाकरराव! तुमचे खुल्या दिलाने स्वागत आणि मन:पूर्वक अभिनंदन! तुम्ही स्वीकारले तरी.. आणि नाकारले तरीही.

तुकारामांचा विचार समाजाला कळला पाहिजे -शिवराज महाराज
पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नागपूर, २३ मे / प्रतिनिधी

सर्व संतांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान स्वीकारले असून बुद्धाच्या विचारांचा कळस तुकारामांच्या


विचारात दिसून येतो. म्हणूनच तुकोबारायांचा विचार समाजाला कळला पाहिजे, अशी कळकळ पंढरपूरच कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी हे होते.
याप्रसंगी शिवराज महाराज यांनी हिंदूू धर्मातील अनिष्ठ प्रथा-परंपरा, अंधश्रद्धांवर कठोर टीका करून संत तुकारामांचा डोळस विचार स्वीकारण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा नेहमीच प्रथा-परंपरांना बळी पडलेला आहे. त्यामुळे तो अजूनही गाफिल आहे. हिंदू धर्मातील भाकडकथांना संतांनी विरोध केला. पण, अजूनही समाजाचे डोळे उघडत नाहीत. लोकांना ज्ञानेश्वर चालत नाही पण, व्यास चालतो. यामागची कारणमीमांसा मात्र त्यांना माहित नसते. आनंद यादवांनी तुकोबांविरुद्ध लिहिले तेव्हा त्यांना आम्ही विरोध केला. त्यावर मोठा गजहब झाला. अशीच टीका यादवांनी संत ज्ञानेश्वरांवरही केली आहे पण, ते पुस्तक कुठे गायब झाले, याचा पत्ताही लागला नाही. कल्पनेप्रमाणे वाहत जाणारे साहित्य समाजाला नको आहे तर समाजाचे खरे चित्रण करणारे साहित्य हवे आहे. तुकोबांनी पोटाकरिता धर्म सांगणाऱ्यांवर प्रहार केला पण, तुकोबाराय समाजाला कळले नाहीत. त्यांचा विचार पुढे नेताना विरोध करणाऱ्याचे तोंड बंद करण्याची हिंमत मराठय़ांनी दाखवली पाहिजे. त्यासाठी मराठय़ांनी एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन शिवराज महाराज यांनी केले. यावेळी शिवराज महाराज यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी चवथ्या मराठा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी सुधाकर गायधनी यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे तसेच ना.गो. थुटे, प्रा. अशोक राणा, डॉ. दिलीप धापके यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
विचारमंचावर जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, आयकर सहआयुक्त पल्लवी दराडे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर, इतिहासकार मा.म. देशमुख, सुमती धनवटे, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, प्रदेश सचिव विजय ठुबे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष जयश्री शेळके, रेव्हरंड नितीन सरदार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे, पुरुषोत्तम कडू, प्रशांत कोहळे, अनंत सोमदे हे उपस्थित होते. संचालन लीना निकम आणि विजया मारोतकर यांनी केले. स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जिजाऊ वंदना विजया कोकाटे यांनी सादर केली. प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले.
क्षणचित्रे
खास शिवकालीन परंपरेनुसार तुतारी वाजवून समारंभाला प्रारंभ झाला.
सिंदखेड राजा येथील जिजाऊ शिवसृष्टीसाठी मराठा सेवा संघ नागपूर शाखेतर्फे मधुकर मेहकरे यांनी अकरा लाख रुपयांचा लाखांचा धनादेश पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सुपूर्द केला.
यावेळी यंदा आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेली शीतल उगले हिचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके येणार म्हणून दिवसभर चर्चा होती पण, ते आले नाहीत. कुलगुरू श.नू. पठाणही हजर नव्हते.
शिवराज महाराज यांनी श्रोत्यांची नस पकडून मिश्किल पण, आग्रही शैलीत भाषण केल्याने त्यांना मोठा प्रतिसाद लाभला.
उद्घाटनच उशिरा झाल्याने अन्य कार्यक्रमांनाही उशिरा सुरुवात झाली. मराठा समाजाच्या वकुबाला शोभेलशी अपेक्षित गर्दी संमेलनाला होऊ शकली नाही.

तुकारामांचा विचार समाजाला कळला पाहिजे -शिवराज महाराज
पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नागपूर, २३ मे / प्रतिनिधी

सर्व संतांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान स्वीकारले असून बुद्धाच्या विचारांचा कळस तुकारामांच्या


विचारात दिसून येतो. म्हणूनच तुकोबारायांचा विचार समाजाला कळला पाहिजे, अशी कळकळ पंढरपूरच कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी हे होते.
याप्रसंगी शिवराज महाराज यांनी हिंदूू धर्मातील अनिष्ठ प्रथा-परंपरा, अंधश्रद्धांवर कठोर टीका करून संत तुकारामांचा डोळस विचार स्वीकारण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा नेहमीच प्रथा-परंपरांना बळी पडलेला आहे. त्यामुळे तो अजूनही गाफिल आहे. हिंदू धर्मातील भाकडकथांना संतांनी विरोध केला. पण, अजूनही समाजाचे डोळे उघडत नाहीत. लोकांना ज्ञानेश्वर चालत नाही पण, व्यास चालतो. यामागची कारणमीमांसा मात्र त्यांना माहित नसते. आनंद यादवांनी तुकोबांविरुद्ध लिहिले तेव्हा त्यांना आम्ही विरोध केला. त्यावर मोठा गजहब झाला. अशीच टीका यादवांनी संत ज्ञानेश्वरांवरही केली आहे पण, ते पुस्तक कुठे गायब झाले, याचा पत्ताही लागला नाही. कल्पनेप्रमाणे वाहत जाणारे साहित्य समाजाला नको आहे तर समाजाचे खरे चित्रण करणारे साहित्य हवे आहे. तुकोबांनी पोटाकरिता धर्म सांगणाऱ्यांवर प्रहार केला पण, तुकोबाराय समाजाला कळले नाहीत. त्यांचा विचार पुढे नेताना विरोध करणाऱ्याचे तोंड बंद करण्याची हिंमत मराठय़ांनी दाखवली पाहिजे. त्यासाठी मराठय़ांनी एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन शिवराज महाराज यांनी केले. यावेळी शिवराज महाराज यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी चवथ्या मराठा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी सुधाकर गायधनी यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे तसेच ना.गो. थुटे, प्रा. अशोक राणा, डॉ. दिलीप धापके यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
विचारमंचावर जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, आयकर सहआयुक्त पल्लवी दराडे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर, इतिहासकार मा.म. देशमुख, सुमती धनवटे, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, प्रदेश सचिव विजय ठुबे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष जयश्री शेळके, रेव्हरंड नितीन सरदार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे, पुरुषोत्तम कडू, प्रशांत कोहळे, अनंत सोमदे हे उपस्थित होते. संचालन लीना निकम आणि विजया मारोतकर यांनी केले. स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जिजाऊ वंदना विजया कोकाटे यांनी सादर केली. प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले.
क्षणचित्रे
खास शिवकालीन परंपरेनुसार तुतारी वाजवून समारंभाला प्रारंभ झाला.
सिंदखेड राजा येथील जिजाऊ शिवसृष्टीसाठी मराठा सेवा संघ नागपूर शाखेतर्फे मधुकर मेहकरे यांनी अकरा लाख रुपयांचा लाखांचा धनादेश पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सुपूर्द केला.
यावेळी यंदा आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेली शीतल उगले हिचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके येणार म्हणून दिवसभर चर्चा होती पण, ते आले नाहीत. कुलगुरू श.नू. पठाणही हजर नव्हते.
शिवराज महाराज यांनी श्रोत्यांची नस पकडून मिश्किल पण, आग्रही शैलीत भाषण केल्याने त्यांना मोठा प्रतिसाद लाभला.
उद्घाटनच उशिरा झाल्याने अन्य कार्यक्रमांनाही उशिरा सुरुवात झाली. मराठा समाजाच्या वकुबाला शोभेलशी अपेक्षित गर्दी संमेलनाला होऊ शकली नाही.

उच्चवर्णीयांच्या साहित्यात मराठा स्त्रीचे हास्यास्पद चित्रण
मराठा साहित्य संमेलनाच्या चर्चासत्रात आरोप
नागपूर, २३ मे/ प्रतिनिधी

मराठा स्त्रीच्या भावविश्वाचे प्रतिबिंब उच्चवर्णीय स्त्रियांच्या लेखनात उद्धृत झाले नसून



उच्चवर्णीय लेखकांनी मराठा स्त्रीचे हास्यास्पद रेखाटन केले असल्याचा आरोप अ.भा. मराठा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात करण्यात आला. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्यातील मराठा स्त्री’ या विषयावरील सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. व्यासपीठावर नगरसेवक उषा बोहरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उज्ज्वला देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मंदा राऊत, बुलढाण्याच्या स्मिता देशमुख, यवतमाळच्या डॉ. छाया महाले आणि लातूरचे तानाजी जाधव होते.
महाले म्हणाल्या, उच्चवर्णीय स्त्रिया लिहायला लागल्यानंतर त्यांचे प्रश्न साहित्यात प्रतिबिंबित झाले. पतीव्रता स्त्रीला आदर्श मानून त्यासाठी पुराणातील सावित्री, सत्यभामा, गांधारी, कुंती या स्त्रियांचा उदोउदो करण्यात आला. मात्र त्यात मराठा स्त्रीचे भावजीवन आले नाही. शोषण, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मराठा स्त्रीच्या हाती शिक्षण हे मोठे शस्त्र दिले. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे मोठेपण सांगणारे साहित्य त्यावेळी निर्माण केले. इंदिरा तेलंग आणि सीताबाई गोडस या मराठा समाजातील स्त्रियांनी पारंपरिक लेखनापेक्षा वेगळी वाट चोखाळली. अलीकडच्या काळात प्रतिमा इंगोले, मलिका अमर शेख आणि रजनी परुळेकर यांनी स्त्रीचे वास्तव चित्र रेखाटल्याचे महाले म्हणाल्या.
तानाजी जाधव म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी साहित्याचा विषय देवी, देवता, कुणी राजा यांच्यापासून सुरु होत असे. हळूहळू शिक्षणामुळे मराठा समाजाला आलेल्या आत्मभानातून ग्रामीण साहित्यातून मराठा स्त्रीचे प्रतिबिंब दिसू लागले. त्यांनी डॉ. रा.रं. बोराडे, डॉ. मथू सावंत यांच्या साहित्यकृतींचा यावेळी धांडोळा घेतला. शिवधर्माचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रयत्नांमुळे मराठा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवधर्म स्वीकारला मात्र, त्यांच्या अर्धागिनी वैदिक धर्मातील कर्मकांड पाळतात. आजही मराठा स्त्री वैदिक गुलामगिरीतून बाहेर येऊ शकली नसल्याचे तानाजी जाधव यांनी ठासून सांगितले. स्मिता देशमुख यांनी मराठा समाजाने वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले म्हणाल्या, श्रमाला अनन्यसाधारण महत्त्व देणे ही मराठा समाजाची खासियत आहे. लोकसाहित्यात मराठा स्त्रीचे चित्रण आले असून यमी आणि रुक्मिणी या पुराणातील स्त्रियांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. उच्चवर्णीयांच्या लेखनात मराठा स्त्रीचे चित्रण आले नसून जे काही थोडेफार लेखन झाले आहे ते हास्यास्पद आणि विनोदाच्या अंगाने आल्याचा तानाजी जाधव यांच्या आरोपाचे प्रतिमा इंगोले यांनीही समर्थन केले. ऐतिहासिक साहित्य आणि आत्मचरित्रामध्ये मराठा स्त्रीच्या चित्रणाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. संचालन रंजना चौधरी यांनी केले, तर प्रतिभा सावंत यांनी आभार मानले.

‘तुकाराम महाराजांचे विचार सार्वकालिक’
नागपूर, २३ मे/प्रतिनिधी

नवीन पिढी कितीही पुढे गेली, आधुनिक झाली तरी, तुकाराम महाराजांचे विचार


सार्वकालिक आहेत हे वास्तव विसरता येण्यासारखे नाही, असा सूर पाचव्या अ. भा. मराठा साहित्य संमेलनातील पहिल्या सत्रात उमटला.
मराठा सेवा संघप्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित या संमेलनातील पहिल्या सत्राचा विषय ‘सार्वकालीन संत तुकाराम महाराज’ हा होता. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ शहरातील इतिहास संशोधक व विचारवंत प्रा. अशोक राणा होते. यावेळी वक्ते म्हणून गोव्यातील गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष रामनाथ नाईक उपस्थित होते. व्यासपीठावर अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे, श्री गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्वर रक्षक, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद माने, सिटिझन फोरमचे संयोजक डॉ. अशोक येंडे उपस्थित होते.
संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा प्रभाव तुकाराम महाराजांवर होता. म्हणूनच शांती आणि सत्यावर तुकाराम महाराजांची अतिनिष्ठा होती. असत्याची चीड आली पाहिजे पण, त्याचबरोबर सत्य मांडताना प्राण अर्पण करायची तयारीही ठेवायला पाहिजे. संत तुकोबारायांचा हाच विचार प्रत्येकाने अंमलात आणावा, असे मत प्रा. अशोक राणा यांनी चर्चासत्रात मांडले. तुकोबारायांच्या अभंगातील स्वाभाविकपणा मांडताना प्रा. राणा यांनी यावेळी तुकाराम महाराजांनी रचलेले अनेक अभंग सादर केले. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून नेहमीच संदेश दिला फक्त घेणाऱ्यांना तो घेता आला पाहिजे हे सांगताना त्यांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. तुकोबारायांचे वास्तव्य ज्या परिसरात होते त्याच परिसरात शिवरायांचे कार्य बहरले हे प्रा. राणा यांनी आवर्जून सांगितले.
तुकाराम महाराजांनी सामान्य माणसांची उदाहरणे देऊन वैश्विक तत्त्वज्ञान जगासमोर मांडले आणि म्हणूनच ते सार्वकालीन ठरले, असे मत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी मांडले. तुकाराम महाराजांबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जातात. कुणी त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या असे म्हणतात तर, कुणी त्या जाळल्या गेल्या, असे म्हणतात पण, सत्य काय ते कुणालाही माहीत नाही, असे रामनाथ नाईक म्हणाले. संत तुकाराम महाराज सर्वकालीन तर आहेच पण, ते सर्वव्यापीसुद्धा आहेत, असेही नाईक यावेळी म्हणाले. चर्चासत्राचे संचालन माधवी शिंदे यांनी केले. ज्योती मोहरकर यांनी आभार मानले.

समाजाला निकोप साहित्याची गरज - ऍड. खेडेकर
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM

नागपूर - देशपांडे हॉल अखिल भारतीय मराठा समाज साहित्य संमेलनात उपस्थितांची भव्य गर्दी.

नागपूर - साहित्यामध्ये समाजाला बदलविण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्यिकांनी समाज घडविणारे निकोप लेखन करावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. दोन दिवस चाललेल्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचा आज सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समारोप झाला. यावेळी समारोपीय भाषण करताना त्यांनी वरील मत व्यक्‍त केले.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, अमेरिकेचे विचारवंत डॉ. थॉम वोल्फ, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके,
बाळासाहेब लुंगे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, प्रा. जैमिनी कडू, नितीन सरदार, ज्येष्ठ सत्यशोधक व माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, डॉ. साहेबराव खंदारे, सुमतीदेवी धनवटे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक धवड, आमदार दीनानाथ पडोळे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, पुरुषोत्तम कडू, अनंतदादा चोंदे, विजयकुमार ठुबे, मधुकर मेहकरे आदी उपस्थित होते.
परखड भाषणात ऍड. खेडेकर म्हणाले, जगातील ५८ देशांना तुकाराम माहिती आहे; परंतु आमच्या भारतीयांना तो अजूनपर्यंत समजला नाही. तुकाराम व महात्मा फुले यांच्या विचारांवर अमेरिका व युरोपमध्ये क्रांती होते. तुकारामांचे साहित्य थोर आहे; परंतु फारच कमी घरांमध्ये त्यांचे ग्रंथ आढळतात, ग्रंथ असले तरीही ते आम्ही समजून घेतले नाहीत. त्यांच्या साहित्यावर आज चिंतनाची खरी गरज आहे. संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस चिंतन झाले, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचविले गेले. हीच संमेलनाची खरी फलश्रुती होय.
ऍड. खेडेकर यांनी साहित्यासोबतच आजच्या पत्रकारितेवरही ताशेरे ओढले. पत्रकारांनी भान ठेवून पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी तोंडसुख घेतले. अमेरिका व युरोपसारखे देश संघाला पोसत असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. वोल्फ यांनी आपल्या भाषणातून नागपूरकरांना महात्मा फुले यांचे विचार समजावून सांगितले. समाजक्रांती घडविणारे म. फुले विदेशातील लोकांना फारसे माहिती नाहीत, याचा खेद वाटतो. फुले सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या व सरळ भाषेत हृदयातील भाषा बोलले. फुलेंना सामाजिक क्रांतीचा जनक संबोधत ते म्हणाले, बहुजनांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मुलींच्या उत्थानासाठी ते लढले. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची आज आवश्‍यकता आहे.
महाकवी गायधनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, तुकाराम जगाला माहिती झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले, अभ्यास झाला. फुले, गांधी, आंबेडकरांसारख्या महापुरुषांना विदेशातील अभ्यासक्रमांमध्ये स्थान मिळावे, अशी इच्छा व्यक्‍त केली.
यावेळी प्रा. सुधाकर मोहोड, प्रा. कडू, सुमतीताई धनवटे, माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, प्रा. मा. म. देशमुख, डॉ. वोल्फ, प्रा. पुरके, अशोक धवड यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा. जैमिनी कडू यांनी सत्काराला उत्तर दिले. संचालन प्रा. मीनाश्री पावडे यांनी केले.
--------------------------------
पुरंदरेंना हटवा

मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवडीचा प्रस्ताव आहे. त्याचा विरोध करण्याचा प्रस्ताव संमेलनात सर्वानुमते पारित करण्यात आला.
--------------------------------
मराठा साहित्याद्वारे इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे - श्रीमंत कोकाटे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM
नागपूर - ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लेखकांनी आतापर्यंतचा इतिहास विकृतपणे मांडला आहे. तो इतिहास मराठा साहित्याच्या माध्यमातून पुनर्लिखित करीत नव्याने मांडावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
मराठा सेवा संघप्रणीत जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पाचव्या मराठा साहित्य संमेलनाच्या सत्रात "मराठा साहित्याची भूमिका' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते गंगाधर बनबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून "प्रतिइतिहास'कार इंजि. चंद्रशेखर शिखरे, मनपाचे विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडधे-पाटील, भारतीय सेवा मंडळाचे राम आकरे उपस्थित होते. कोकाटे म्हणाले, "मराठी साहित्य हे केवळ पु. ल. देशपांडे, अत्रे व खांडेकरांचे साहित्य आहे. संत तुकारामाचे साहित्य हे मराठा साहित्य आहे. अलीकडे त्यात. मा. म. देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर, प्रा. अशोक राणा यांच्या साहित्याची भर पडली आहे. मराठा आणि ब्राह्मणी साहित्याची तुलना करताना ब्राह्मणी साहित्याने शिवाजी महाराजांचा संघर्ष धार्मिक संघर्ष म्हणून मांडला. मात्र, तो संघर्ष धार्मिक नसून राजकीय संघर्ष होता. याशिवाय संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न साहित्यात करण्यात आला. यातून पसरणारे विचार आपल्या मुलांना शिक्षणसत्ता आणि अर्थसत्तेपासून दूर ठेवण्याचे षड्‌यंत्र आहे. याविरुद्ध संघर्ष न केल्यास बहुजनांचे ब्राह्मणीकरण होईल.
मराठा साहित्यात समतेची व विश्‍वव्यापकतेची भूमिका आहे. ती भूमिका जगासमोर आणण्यासाठी इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिण्याची गरज आहे. जो इतिहास विसरतो, तो इतिहास लिहू शकत नाही, तेव्हा आजच्या पिढीने तो विसरता कामा नये. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अधिकाअधिक संशोधनात्मक, ललित, नाटक, कादंबरी, कविता यासारख्या साहित्याची निर्मिती करीत तुकाराम महाराजांची प्रतिमा उदात्त करावी, असे आवाहन त्यांनी केले. बनबरे म्हणाले, "मराठा साहित्य हे एका जातीला प्रेरक असे साहित्य नाही. ते सर्वांना प्रेरक आहे. या तुलनेत मराठी साहित्य संकुचित स्वरूपाचे आहे. आज भाषेचा दहशतवाद डोक्‍यात पसरविण्यात येत असून, तो डोक्‍यात शिरू न देता नवे प्रश्‍न नव्या भूमिका ठेवा. आजही आम्ही प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा, अशी शाहू-फुलेंची मागणी करतो. हा त्यांचा विचारांचा पराभव आहे. यावेळी इंजि. चंद्रशेखर शिखरे यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन रजनी डहाके यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
..............
परस्परांना समजून घेतल्यानेच जीवनप्रवास सुखी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM
नागपूर - भिन्न स्वभाव, कार्यक्षेत्रही वेगळे, त्याही परिस्थितीत सामाजिक बांधिलकी व संसाराला सांभाळत, आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या खेडेकर दाम्पत्याने जीवनपट उलगडवून दाखविला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पाचव्या मराठा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "आमचे जीवनगाणे' या प्रगट मुलाखतीतून त्यांनी सुखी व यशस्वी जीवनाचे रहस्य सांगितले.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर व त्यांच्या अर्धांगिनी चिखलीच्या आमदार रेखाताई खेडेकर यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्‍याम मानव यांनी प्रगट मुलाखत घेतली. दीड तासांच्या या मुलाखतीदरम्यान खेडेकर दाम्पत्याने सामाजिक कार्यापासून ते खासगी आयुष्यातील सर्व गुपिते उपस्थितांसमोर उघड सुखी आयुष्याचे गमक सांगितले. एकमेकांप्रती विश्‍वास, प्रेम, आदर, करुणा, माया, समजूतदारपणा इत्यादी गुणांमुळेच दोघेही संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढण्यात यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
श्‍याम मानव यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नांचे उत्तर त्यांनी आत्मविश्‍वासाने दिले. लग्न का केले, त्यामागचा उद्देश काय, पतीला पत्नीकडून आणि पत्नीला पतीकडून असलेल्या अपेक्षा इ. सांगताना त्यांनी आयुष्यातील छोटे छोटे किस्से सांगितले. आग ओकणाऱ्या व नेहमी शिवीगाळ करणाऱ्या कठोर हृदयाच्या व्यक्‍तीसोबत संसार करताना कधीही त्रास गेला नसल्याचे रेखाताईंनी सांगितले. पती रागात असेल तर पत्नीने बोलू नये आणि पत्नीचा पारा वर असेल, तर पतीने काहीही बोलू नये; असे वागले तर संसारात वादळ निर्माण होत नाही, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझे पती अनेकांना कठोर व आक्रमक वाटत असले, तरी मनाने खूप चांगले आहेत. अत्यंत भावनाशील व संवेदनशील असा हा माणूस आहे, हे माझे भाग्य आहे. या माणसाने आपल्याला प्रेमच दिले नाही, तर पावलोपावली समजून घेतले, असे उच्च शिक्षित रेखाताईंनी सांगितले. खेडेकरांनीही बायकोचे म्हणणे ऐकल्याने संसार सुखी होतो, अशी कबुली दिली.
रेखाताईंचा राजकारणातील प्रवेशाचा निर्णय कुटुंबातील सर्व सदस्यांनी सर्वानुमते घेतल्याचे सांगून खेडेकर म्हणाले, पत्नी आमदार बनल्यानंतरही आमच्यातील प्रेम कमी झाले नाही, उलट जबाबदारीनेच वागलो. दोघांनीही एकमेकांच्या क्षेत्रात ढवळाढवळ केली नाही. एखादा कटू प्रसंग आलाच तर चर्चेच्या माध्यमातून सोडविला. संयुक्‍त कुटुंब असल्याने तिन्ही मुलांवर चांगले संस्कार झाले. बायको मिळणे कठीण असते, याची मला जाण होती. त्यामुळेच मी पत्नीला जीवापाड वागविले. तिने मला पसंत केले नसते, तर कदाचित मला रामदासांप्रमाणे अविवाहित राहावे लागले असते, असे ते मिस्किलपणे म्हणाले. या मुलाखतीच्या निमित्ताने दोघांनाही त्यांचे जुने दिवस आठवले.
यावेळी व्यासपीठावर प्रभाकरराव देशमुख व प्रिया देशमुख, रमेश बोरकुटे, लक्ष्मणराव बोदडे व इंदिरा बोदडे, अजय पाटील व प्रगती पाटील आणि मधुकर मेहकरे व श्रीमती मेहकरे उपस्थित होते.
अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाला नख लावू नका - गायधनी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 23rd, 2009 AT 10:05 PM

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह - पाचव्या अ. भा. मराठा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना, संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव, बाळासाहेब लुंगे, आमदार रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, डॉ. साहेबराव खंदारे व इतर मान्यवर. (सकाळ छायाचित्रसेवा)

नागपूर - लेखक किंवा साहित्यिकाने अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाला नख लावणारे लेखन करु नये, अशी प्रतिक्रिया पाचव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्‍त करीत डॉ. आनंद यादव यांच्या लेखनाचा समाचार घेतला. साहित्य केवळ वाचकांचे मनोरंजन करण्यासाठी किंवा वाद निर्माण करण्यासाठी नव्हे, तर वास्तववादाला हात घालून समाजाला दिशा दाखविणारे असावे, अशी अपेक्षा त्यांनी बहूजन लेखकांकडून व्यक्‍त केली.
पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पंढरपूर येथील कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते शनिवारी थाटात उद्‌घाटन झाले. विचारपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, चिखलीच्या आमदार रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, आयकर विभागाच्या सहआयुक्‍त पल्लवी दराडे, चौथ्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. साहेबराव खंदारे, मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव विजयकुमार ठुबे, संभाजी ब्रिगेडचे अनंतदादा चोंदे, देवानंद कापसे, नितिन सरदार, पुरुषोत्तम कडू, इतिहासकार मा. म. देशमुख, सुमतीताई धनवटे, टी. टी. ठाकरे, विजयकुमार शिंदे, विभागीय अध्यक्ष मधूकर मेहकरे, शारदा देशमुख आदी उपस्थित होते.
महाकवी गायधनी म्हणाले, आज साहित्यिकांना सत्य दिसत नाही ही खेदाची बाब आहे. त्यांना जबाबदारीची जाणीव होईल, तेव्हाच खऱ्याअर्थाने समाज परिवर्तन घडेल. कारण साहित्यिकांमध्ये समाजातील प्रत्येक वाईट गोष्टी बदलविण्याची ताकद आहे.
मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करीत
श्री. गायधनी म्हणाले, मराठा समाज मनाने उदार आहे. म्हणूनच त्यांनी सर्वांना आपले मानून जवळ केले. या समाजाने जाती, पंथ किंवा धर्माला चिकटून राहण्याचा संकुचितपणा कधीही दाखविला नाही. दलितांनी एकसंघ राहून आपला विकास करवून घेतला. मराठा समाजानेही त्यांच्यापासून धडा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. गायधनी यांनी इतरही विषयांना हात घातला. त्यांनी शालेय अभ्यासक्रमात तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्याचे शिकविले जात असल्याबद्‌दल आश्‍चर्य व्यक्‍त करीत, अभ्यासक्रमातून ते काढून टाकण्याची मागणी केली. नागपूर विद्‌यापीठाबद्‌दल उच्चारण्यात येणाऱ्या "आरटीएम' किंवा "रातुम' या शब्दांवरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी आपल्या विवेचनपूर्ण भाषणात बुवाबाजीवरही टिका केली. जगात कोणतीही दैवी शक्‍ती नसल्याचे सांगून, महिलांना आसारामबापूंसारख्या बुवांकडे न जाण्याची विनंती केली. बोलीभाषेत मोठे सामर्थ्य असल्याचे सांगून, त्यांनी राज्यात बोलीभाषा विद्‌यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली.
संमेलनाचे उद्‌घाटक शिवराज महाराजांनी परखड मत व्यक्‍त करीत, दैनंदिन जीवनात घडणारे अनेक किस्से ऐकविले. त्यांच्या भाषणाने सर्वाधिक टाळ्या तर घेतल्याच, शिवाय साहित्यासारख्या जड विषयाने गंभीर झालेल्या वातावरणात हास्यही फुलविले. या निमित्ताने मराठा समाजाला संत तुकारामांची आठवण होणे व राज्यातील समाजबांधव एकत्र येणे, हे संमेलनाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. पैशाच्या मागे लागलेल्या आजच्या ढोंगी साधुसंतांवरही त्यांनी प्रहार केला. संत तुकाराम, ज्ञानेश्‍वर हेच खरे संत असून, त्यांची शिकवण आत्मसात करण्याचा त्यांनी सल्ला दिला.
डॉ. खंदारे यांनी मराठी साहित्य व मराठा साहित्य यातील फरक सांगून, मराठी ही प्रशासनाची भाषा व्हावी अशी इच्छा व्यक्‍त केली. वाङमयाची निर्मिती साहित्याचा शोध घेण्यासाठी झाली असून, अशाप्रकारची संमेलने त्यादिशेने महत्वाचे पाऊल ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली. बाळासाहेब लुंगे यांनी साहित्यिकांना प्रामाणिक व निकोप राहून लेखन करण्याचा सल्ला दिला. प्रामाणिक नसलेल्या लेखकांचे साहित्य फसवे असते, असे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ना. गो. थुटे, प्रा. अशोक राणा आणि दिलीप धापके यांच्याही पुस्तकाचे प्रकाशन झाले. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्तविक विजयकुमार शिंदे यांनी केले. संचालन लिना निकम व विजया मारोतकर यांनी केले, आभार सुरेखा कापसे यांनी मानले. डॉ. विजया कोकाटे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. कार्यक्रमाला गंगाधरराव पन्नासे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्ञानेश्‍वर रक्षक, दादासाहेब ठाकरे, प्रा. प्रभाकर पावडे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अन्य संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
मराठा साहित्य संमेलन २३ पासून
सकाळ वृत्तसेवा
Thursday, May 07th, 2009 AT 10:05 PM
नागपूर - मराठा सेवा संघ प्रणित जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे पाचवे मराठा साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन्स येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक विजयकुमार शिंदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार,(ता.22) सायंकाळी 6 वाजता महाराजबाग येथील डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळयापासून जगद्‌गुरू तुकोबाराय चतुर्थ जन्मशताब्दीनिमित्त मिरवणूक व ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचा समारोप रात्री 9.30 वाजता डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे होईल.
शनिवार,(ता.23) सकाळी 9 वाजता संमेलनाचे उद्‌घाटन शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सुधाकर गायधनी राहतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब लुंगे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, पुरूषोत्तम खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, नेताजी गोरे, विजयकुमार ठुबे, जयश्री शेळके, अंनतदादा चोंदे, देवानंद कापसे, सुनील सरदार, पुरूषोत्तम कडू, मधुकर मेहकरे उपस्थित राहतील.
दुपारी 2 वाजता सार्वकालीक संत तुकाराम महाराज या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5 वाजता साहित्यातील मराठा स्त्री यावर वक्‍ते विचार व्यक्‍त करतील. रात्री 8 वाजता शिवशब्द गजर हे कवीसंमेलन होईल. रविवार, (ता.24) सकाळी 9 वाजता वाचकांच्या साहित्याकडून अपेक्षा तर सकाळी 11 वाजता मराठा साहित्याची भूमीका या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी 3 वाजता आमचे जीवनगाणे : शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर आणि शिवमती रेखा खेडेकर यांची प्रगट मुलाखत होईल. सायंकाळी 5 वाजता सुधाकर गायधनी यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला सुधाकर मोहोड, प्रशांत कोहळे, अभिजित दळवी आदी उपस्थित होते.

नागपूर - जय शिवाजी व जय जिजाऊचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात असंख्य आकर्षक चित्ररथांचा समावेश असलेल्या मिरवणूक व ग्रंथदिंडीने आज मध्य नागपूर दुमदुमले. मराठा साहित्य समंलेनाच्या पूर्वसंध्येला जगदगुरू तुकोबारायांच्या चतुर्थ जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी काढण्यात आलेल्या या दिंडीत लहानथोरांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
ग्रंथदिंडीची सुरुवात महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून झाली. तत्पूर्वी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी यांनी डॉ. देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीची पूजा केली. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, विभागीय अध्यक्ष मधुककराव मेहकरे, कॉंग्रेसचे माजी नेते मुकुंदराव पन्नासे, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्‍वर रक्षक, रमेश बोरकुटे, चंद्रशेखर चांदेकर, संजय शेंडे, प्रदीप शेंडे, डॉ. शांतिदास लुंगे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.
ग्रंथदिंडी झेंडा चौक (धरमपेठ), लक्ष्मी भवन चौक, शंकरनगर, सिमेंट रोड, रामनगर, गोकुलपेठ, लॉ कॉलेज चौकमार्गे जाऊन डॉ. देशपांडे सभागृहात समारोप झाला. दिंडीत संत तुकाराम, डॉ. आ. ह. साळुंके, मा. म. देशमुख, जैमिनी कडू यांच्यासह अनेक प्रसिद्ध लेखकांचे जवळपास दीडशे ग्रंथ ठेवण्यात आले होते. ग्रंथदिंडीत बाल शिवाजी, जिजाऊ, तुकारामांची वेशभूषा असलेले कलाकार, भजन मंडळ, लेझीम पथकासह सहा आकर्षक चित्ररथांचा समावेश होता. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अन्य संघटनांचे पदाधिकारी तसेच शाळकरी मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता.
आज मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन
जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने पाचवे मराठा साहित्य संमेलन उद्या (ता. 23) पासून डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद महाकवी सुधाकर गायधनी भुषवणार असून, उद्‌घाटन पंढरपूरच्या कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी अधीक्षक अभियंता बाळासाहेब लुंगे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श. नू. पठाण, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, पुरुषोत्तम खेडेकर, रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
उद्‌घाटनानंतर सार्वकालीक संत तुकाराम महाराज आणि साहित्यातील मराठा स्त्री या विषयांवर चर्चासत्र होईल. यात विचारवंत, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. तिसऱ्या सत्रात प्रा. ज्ञानेश वाकुडकर व परभणीचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या मुख्य उपस्थितीत कविसंमेलन होईल.